शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
4
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
5
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
6
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
7
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
8
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
9
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
10
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
11
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
12
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
13
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
14
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
15
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
16
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
17
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
18
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
19
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
20
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा

सामाजिक न्याय विभागाचे कामकाज ठप्प

By admin | Updated: September 13, 2016 02:58 IST

सामाजिक न्याय विभागाशी निगडित असलेल्या कार्यालयांमध्ये सोमवारी नागरिकांना रिकाम्या हाताने परत

नागपूर : सामाजिक न्याय विभागाशी निगडित असलेल्या कार्यालयांमध्ये सोमवारी नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. सामाजिक न्याय विभागातील राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पुकारलेले लेखणीबंद आंदोलनामुळे कुठलेही कामकाज झाले नाही. कामकाज ठप्प झाल्याने मोठा फटका शासन व नागरिकांना बसला. समाजकल्याण उपायुक्तांसह जातपडताळणी समितीचे सदस्यांनी आपल्या मागण्यांसदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाची गंभीरता पटवून दिली. उपायुक्त समाजकल्याण, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहा. आयुक्त समाजकल्याण नागपूर, समाजकल्याण अधिकारी नागपूर जिल्हा परिषद या कार्यालयाच्या दर्शनी भागावर लेखणीबंदचे फलक झळकत होते. अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचारीही कार्यालयात उपस्थित होते. परंतु कुठल्याही शासकीय कामकाजाला हात लावला नाही. शासनाने शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनेत झालेल्या घोळाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू केल्याने, चौकशीच्या माध्यमातून एसआयटीमार्फत अधिकारी कर्मचाऱ्यांची छळवणूक होत आहे. नैसर्गिक न्यायाची संधी न देता अधिकारी, कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहे. एसआयटीच्या मनमानीमुळे सामाजिक न्याय विभाग धास्तीत आहे. एसआयटीकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया थांबवावी, शिष्यवृत्ती योजना राबविण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशातच तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. सामाजिक न्याय विभागात मोठ्या संख्येने रिक्त पदे आहेत. त्यामुळे कामाचा व्याप वाढलेला आहे. विभागातील समस्येसंदर्भात मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांनाही अवगत केले आहे. परंतु कुठल्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून काळ्याफिती लावून काम करण्यात आले. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत लेखणीबंदचे आवाहन केले होते. आपल्या मागण्यांसदर्भात समाजकल्याण उपायुक्त माधव झोड, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रं. १ व ३ चे उपायुक्त व सदस्य आर.डी. आत्राम, सुरेंद्र पवार, सहा. आयुक्त समाजकल्याण नागपूर विजय वाकुडकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र भुजाडे, दिनेश कोवे, सुशील शिंदे यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना निवेदन दिले. शासन जोपर्यंत दखल घेणार नाही, तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अधिकारी व कर्मचारी संघटनानी केला आहे.(प्रतिनिधी)