शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

सामाजिक न्याय विभागाचे कामकाज ठप्प

By admin | Updated: September 13, 2016 02:58 IST

सामाजिक न्याय विभागाशी निगडित असलेल्या कार्यालयांमध्ये सोमवारी नागरिकांना रिकाम्या हाताने परत

नागपूर : सामाजिक न्याय विभागाशी निगडित असलेल्या कार्यालयांमध्ये सोमवारी नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. सामाजिक न्याय विभागातील राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पुकारलेले लेखणीबंद आंदोलनामुळे कुठलेही कामकाज झाले नाही. कामकाज ठप्प झाल्याने मोठा फटका शासन व नागरिकांना बसला. समाजकल्याण उपायुक्तांसह जातपडताळणी समितीचे सदस्यांनी आपल्या मागण्यांसदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाची गंभीरता पटवून दिली. उपायुक्त समाजकल्याण, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहा. आयुक्त समाजकल्याण नागपूर, समाजकल्याण अधिकारी नागपूर जिल्हा परिषद या कार्यालयाच्या दर्शनी भागावर लेखणीबंदचे फलक झळकत होते. अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचारीही कार्यालयात उपस्थित होते. परंतु कुठल्याही शासकीय कामकाजाला हात लावला नाही. शासनाने शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनेत झालेल्या घोळाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू केल्याने, चौकशीच्या माध्यमातून एसआयटीमार्फत अधिकारी कर्मचाऱ्यांची छळवणूक होत आहे. नैसर्गिक न्यायाची संधी न देता अधिकारी, कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहे. एसआयटीच्या मनमानीमुळे सामाजिक न्याय विभाग धास्तीत आहे. एसआयटीकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया थांबवावी, शिष्यवृत्ती योजना राबविण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशातच तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. सामाजिक न्याय विभागात मोठ्या संख्येने रिक्त पदे आहेत. त्यामुळे कामाचा व्याप वाढलेला आहे. विभागातील समस्येसंदर्भात मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांनाही अवगत केले आहे. परंतु कुठल्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून काळ्याफिती लावून काम करण्यात आले. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत लेखणीबंदचे आवाहन केले होते. आपल्या मागण्यांसदर्भात समाजकल्याण उपायुक्त माधव झोड, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रं. १ व ३ चे उपायुक्त व सदस्य आर.डी. आत्राम, सुरेंद्र पवार, सहा. आयुक्त समाजकल्याण नागपूर विजय वाकुडकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र भुजाडे, दिनेश कोवे, सुशील शिंदे यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना निवेदन दिले. शासन जोपर्यंत दखल घेणार नाही, तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अधिकारी व कर्मचारी संघटनानी केला आहे.(प्रतिनिधी)