शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

फरार ठगबाजाने दिल्लीत अनेकांना लावला कोट्यवधींचा चुुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:09 IST

जगदीश जोशी नागपूर : टॅक्सी भाड्यावर चालवण्याचे आमिष दाखवून नागपुरात अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या सुभाष बंजाराने दिल्लीतही जवळपास ...

जगदीश जोशी

नागपूर : टॅक्सी भाड्यावर चालवण्याचे आमिष दाखवून नागपुरात अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या सुभाष बंजाराने दिल्लीतही जवळपास दोन हजार टॅक्सी मालकांना कोट्यवधीचा चुना लावला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात साडेपाच महिन्यांपासून फरार असूनही पोलीस त्याला शोधण्यासाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळेच बंजारा चार महिन्यातच दिल्लीतूनही कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला. हा प्रकार उघडकीस येताच शहरातील पीडितांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

बंजारपा मुळचा जळगावचा आहे. त्याची सासुरवाडी उमरेडची आहे. तो अनेक वर्षांपासून टॅक्सी भाड्याने चालवण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत आहे. त्याच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात गुन्हे दाखल आहेत. त्याने कोरोना संसर्गादरम्यान एलआयसी चौकाजवळ कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी सुरु केली होती. टॅक्सी मालकांना त्याच्याशी जुळल्यास टॅक्सीच्या मोबदल्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. रजिस्ट्रेशनच्या नावावर शहरात ७५०० आणि शहराबाहेरसाठी १७,५०० रुपये घेतले होते. जुलैमध्ये टॅक्सी सर्व्हीस सुरु केली. ऑगस्टमध्ये रोख रक्कम अदा केली. परंतु सप्टेंबरमध्ये धनादेश दिले. त्यानंतर ते धनादेश बाऊन्स झाल्यावर तो टॅक्सी मालकांना वेगवेगळे कारण सांगू लागला. परंतु मालकंनी पैसे परत मागण्यासाठी दबाव वाढवला तेव्हा तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. १४ सप्टेंबर रोजी ससदर पोलिसांनी दिनेश मिश्रा यांच्या तक्रारीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सूत्रानुसार तपासात जवळपास ४५० टॅक्सी मालकांकडून ४.२० कोटी रुपयाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी २५० पेक्षा अधिक लोकांची साक्षही नोंदवून घेतली.

नागपुरातून फरार झाल्यानंतर बंजारा मुंबई मार्गे दिल्ली पोहोचला. दिल्लीच्या वजीरपूर येथे नेताजी सुभाष पॅलेस येथे त्याने योयो टॅक्सी सर्व्हीस सुरु केली. तिथे सुद्धा त्याने नागपूरच्या धर्तीवर टॅक्सी मालकांना आपल्या जाळ्यात अडकविले. डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत २ हजार टॅक्सी मालक बंजाराच्या योयो सर्व्हीसशी जुळले. त्याने ६५ ते ३५ हजरा रुपये रजिस्ट्रेशनच्या नावावर घेतले. नेहमीप्रमाणे पहिल्या महिन्यात त्याने वेळेवर पैसे परत केले. टॅक्सी मालकांचा विश्वास बसल्याने अनेक लोक त्याच्याशी जुळले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. टॅक्सी मालकांनी वजीरपूर ठाण्यात, डीसीपी आणि ईडीकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बंजारा नागपुरातील एका पीडित टॅक्सी मालकाची कार घेऊन फरार झाला होता. ती कार ५ ऑक्टोबर मुंबईत चालान झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी दिल्लीतील काश्मिरी गेट, ८ डिसेंबर रोजी वजीराबाद आणि १३ जानेवारी २०२१ रोजी कॅम्प चौक येथे चालान झाले. कार मालकास मोबाईलवर ई-चालान झाल्याचा एसएमएस आला. त्याने लगेच सदर पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा आरोपीला सहजपणे शोधता आले असते परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.