शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बुरशीजन्य राेगामुळे माेसंबीची फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या राेगांमुळे झाडांची फळे पटापट गळत असल्याने तालुक्यातील माेसंबी बागायतदार हवालदिल झाले आहेत.

नरखेड तालुक्यात एकूण ४,०८७ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा आहेत. यातील बहुतांश बागांमध्ये ही फळगळ आढळून आली आहे. तालुक्यात १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, पावसाच्या पाण्याचा जमिनीत याेग्य निचरा हाेत नाही. शिवाय वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुरशीला पाेषक वातावरण मिळाल्याने बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

फळगळ होण्यामागे आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. वातावरणातील बदलामुळे वनस्पतीमधील आंतरिक घडामोडींमध्ये अडथळा निर्माण हाेताे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. झाडांचे याेग्य पोषण न झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी सांगितले. सध्या ब्राऊन रॉट प्रकारची फळगळ सुरू आहे. फायटोप्थोरा या बुरशीमुळे ही फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात हिरव्या फळांवर तपकिरी, करडे डाग तयार हाेतात. त्यामुळे फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. संक्रमणामुळे फळगळतीला सुरुवात झाली असून, या अवस्थेला ब्राऊन रॉट असे संबोधतात. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणात फोफावताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी स्पष्ट केले.

...

फळगळतीचे चार प्रकार

झाडाला क्षमतेपेक्षा अधिक फळ असणे हे फळगळतीचे नैसर्गिक करण आहे. यासाठी झाडांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.एका झाडाची क्षमता ८०० ते १,००० फळांची आहे. वातावरणातील बदल, फळमाशी व पतंगाच्या डंखामुळे कीड लागून फळगळती होते. जमिनीतील आर्द्रता वाढल्याने बुरशी तयार होते. फळाच्या देठांवर पावसाचे पाणी राहिल्याने तेथे बुरशी निर्माण होऊन फळगळती होते. कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीजन्य राेगांमुळे फळगळ हाेते, अशी माहिती डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

...