शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बुरशीजन्य राेगामुळे माेसंबीची फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या राेगांमुळे झाडांची फळे पटापट गळत असल्याने तालुक्यातील माेसंबी बागायतदार हवालदिल झाले आहेत.

नरखेड तालुक्यात एकूण ४,०८७ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा आहेत. यातील बहुतांश बागांमध्ये ही फळगळ आढळून आली आहे. तालुक्यात १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, पावसाच्या पाण्याचा जमिनीत याेग्य निचरा हाेत नाही. शिवाय वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुरशीला पाेषक वातावरण मिळाल्याने बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

फळगळ होण्यामागे आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. वातावरणातील बदलामुळे वनस्पतीमधील आंतरिक घडामोडींमध्ये अडथळा निर्माण हाेताे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. झाडांचे याेग्य पोषण न झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी सांगितले. सध्या ब्राऊन रॉट प्रकारची फळगळ सुरू आहे. फायटोप्थोरा या बुरशीमुळे ही फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात हिरव्या फळांवर तपकिरी, करडे डाग तयार हाेतात. त्यामुळे फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. संक्रमणामुळे फळगळतीला सुरुवात झाली असून, या अवस्थेला ब्राऊन रॉट असे संबोधतात. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणात फोफावताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी स्पष्ट केले.

...

फळगळतीचे चार प्रकार

झाडाला क्षमतेपेक्षा अधिक फळ असणे हे फळगळतीचे नैसर्गिक करण आहे. यासाठी झाडांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.एका झाडाची क्षमता ८०० ते १,००० फळांची आहे. वातावरणातील बदल, फळमाशी व पतंगाच्या डंखामुळे कीड लागून फळगळती होते. जमिनीतील आर्द्रता वाढल्याने बुरशी तयार होते. फळाच्या देठांवर पावसाचे पाणी राहिल्याने तेथे बुरशी निर्माण होऊन फळगळती होते. कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीजन्य राेगांमुळे फळगळ हाेते, अशी माहिती डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

...