शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

बुरशीजन्य राेगामुळे माेसंबीची फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या राेगांमुळे झाडांची फळे पटापट गळत असल्याने तालुक्यातील माेसंबी बागायतदार हवालदिल झाले आहेत.

नरखेड तालुक्यात एकूण ४,०८७ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा आहेत. यातील बहुतांश बागांमध्ये ही फळगळ आढळून आली आहे. तालुक्यात १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, पावसाच्या पाण्याचा जमिनीत याेग्य निचरा हाेत नाही. शिवाय वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुरशीला पाेषक वातावरण मिळाल्याने बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

फळगळ होण्यामागे आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. वातावरणातील बदलामुळे वनस्पतीमधील आंतरिक घडामोडींमध्ये अडथळा निर्माण हाेताे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. झाडांचे याेग्य पोषण न झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी सांगितले. सध्या ब्राऊन रॉट प्रकारची फळगळ सुरू आहे. फायटोप्थोरा या बुरशीमुळे ही फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात हिरव्या फळांवर तपकिरी, करडे डाग तयार हाेतात. त्यामुळे फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. संक्रमणामुळे फळगळतीला सुरुवात झाली असून, या अवस्थेला ब्राऊन रॉट असे संबोधतात. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणात फोफावताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी स्पष्ट केले.

...

फळगळतीचे चार प्रकार

झाडाला क्षमतेपेक्षा अधिक फळ असणे हे फळगळतीचे नैसर्गिक करण आहे. यासाठी झाडांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.एका झाडाची क्षमता ८०० ते १,००० फळांची आहे. वातावरणातील बदल, फळमाशी व पतंगाच्या डंखामुळे कीड लागून फळगळती होते. जमिनीतील आर्द्रता वाढल्याने बुरशी तयार होते. फळाच्या देठांवर पावसाचे पाणी राहिल्याने तेथे बुरशी निर्माण होऊन फळगळती होते. कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीजन्य राेगांमुळे फळगळ हाेते, अशी माहिती डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

...