शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

बुरशीजन्य राेगामुळे माेसंबीची फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या राेगांमुळे झाडांची फळे पटापट गळत असल्याने तालुक्यातील माेसंबी बागायतदार हवालदिल झाले आहेत.

नरखेड तालुक्यात एकूण ४,०८७ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा आहेत. यातील बहुतांश बागांमध्ये ही फळगळ आढळून आली आहे. तालुक्यात १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, पावसाच्या पाण्याचा जमिनीत याेग्य निचरा हाेत नाही. शिवाय वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुरशीला पाेषक वातावरण मिळाल्याने बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

फळगळ होण्यामागे आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. वातावरणातील बदलामुळे वनस्पतीमधील आंतरिक घडामोडींमध्ये अडथळा निर्माण हाेताे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. झाडांचे याेग्य पोषण न झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी सांगितले. सध्या ब्राऊन रॉट प्रकारची फळगळ सुरू आहे. फायटोप्थोरा या बुरशीमुळे ही फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात हिरव्या फळांवर तपकिरी, करडे डाग तयार हाेतात. त्यामुळे फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. संक्रमणामुळे फळगळतीला सुरुवात झाली असून, या अवस्थेला ब्राऊन रॉट असे संबोधतात. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणात फोफावताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी स्पष्ट केले.

...

फळगळतीचे चार प्रकार

झाडाला क्षमतेपेक्षा अधिक फळ असणे हे फळगळतीचे नैसर्गिक करण आहे. यासाठी झाडांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.एका झाडाची क्षमता ८०० ते १,००० फळांची आहे. वातावरणातील बदल, फळमाशी व पतंगाच्या डंखामुळे कीड लागून फळगळती होते. जमिनीतील आर्द्रता वाढल्याने बुरशी तयार होते. फळाच्या देठांवर पावसाचे पाणी राहिल्याने तेथे बुरशी निर्माण होऊन फळगळती होते. कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीजन्य राेगांमुळे फळगळ हाेते, अशी माहिती डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.

...