शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आघाडीत बिघाडीचे संकेत

By admin | Updated: November 9, 2016 02:59 IST

महापालिकेची गेली निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लढवली.

काँग्रेसला नको राष्ट्रवादीची साथ : राष्ट्रवादीचे मात्र ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’कमलेश वानखेडे नागपूरमहापालिकेची गेली निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लढवली. यावेळी मात्र, आघाडीत बिघाडी होण्याची अधिक शक्यता दिसत आहे. राष्ट्रवादीला हात देऊन काहीच फायदा झाला नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर काँग्रेसमुळे आम्ही फसलो, अशी राष्ट्रवादीची भावना आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र, ५० जागा मिळत असतील तरच आम्ही मैत्रीसाठी तयार आहोत, असे सांगून राष्ट्रवादीने तूर्तास ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे.महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १४५ पैकी ४५ जागांसाठी ताणून धरले होते. शेवटी तीळसंक्रांतीच्या दिवशी गोड शेवट होत आघाडी झाली. २९ जागांवर राष्ट्रवादीने समाधान मानले. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला ६ तर काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचा निकाल २० टक्के तर काँग्रेसचा ३३ टक्के लागला. काँग्रेसच्या यशात लोकमंचचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी नगरसेवकांची संख्या १५१ झाली आहे. सहा जागा वाढल्यामुळे राष्ट्रवादीच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. प्रभागाचा विस्तार मोठा असल्यामुळे निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. शहरात पक्षाच्या ताकदीची जाणीव असल्यामुळे राष्ट्रवादीचे बहुतांश नेते व कार्यकर्ते आघाडीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसने किमान ५० जागा सोडाव्या, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादीला हलक्यात घेऊ नये. सर्व जागा जिंकण्याची राष्ट्रवादीची ताकद नसली तरी काँग्रेसचे पहेलवान चित करण्याएवढी ताकद नक्कीच आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही, अशा रोखठोक भावना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच काँग्रेसशी चर्चा करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. दुसरीकडे काँग्रेस हातमिळवणी करण्याच्या मानसिकतेत नाही. नुकतेच शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला व प्रदेश काँग्रेसकडे पाठविला. राष्ट्रवादी आघाडी करताना निवडून येणाऱ्या जागांची मागणी करते. शिवाय सोडलेल्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत नाहीत. यात काँग्रेसचे नुकसान होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.