शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

रेल्वेतील १४०० कर्मचाऱ्यांची पदे गोठवा

By admin | Updated: June 23, 2017 02:19 IST

१९८० च्या दशकात भारतीय रेल्वेत एकूण २२ लाख रेल्वे कर्मचारी होते. परंतु मागील ३० वर्षांत रेल्वेगाड्यांची संख्या दहापटीने

रेल्वे बोर्डाचे निर्देश : खासगीकरणामुळे कर्मचारी ठरताहेत अतिरिक्तदयानंद पाईकराव । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९८० च्या दशकात भारतीय रेल्वेत एकूण २२ लाख रेल्वे कर्मचारी होते. परंतु मागील ३० वर्षांत रेल्वेगाड्यांची संख्या दहापटीने वाढूनही रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या १२ लाखांवर आली आहे. खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेतील एक हजार आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील ४०० पदे गोठविण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश झोनस्तरावर येऊन ठेपला आहे. अशा पद्धतीने रेल्वे कर्मचाऱ्यांची पदे गोठविल्यास ही बाब रेल्वेसाठी घातक ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.भारतीय रेल्वेत खासगीकरणावर भर देण्यात येत आहे. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात येत आहेत. पूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर १८ आरक्षणाच्या तिकिटाचे काऊंटर होते. हे काऊंटर आता नऊवर आले आहेत. दिवसेंदिवस खासगीकरणाचे धोरण अवलंबण्यात येत असल्यामुळे कामाचा ताण वाढून कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. खासगीकरणामुळे प्रवाशांच्या समस्या वाढून त्याचा रेल्वेगाड्यांच्या संचालनावर विपरीत परिणाम होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सफाईचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदारांकडून सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्यामुळे त्याचा रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेवर परिणाम होतो. परंतु कर्मचारी कमी करण्याच्या नादात रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नुकतेच रेल्वे बोर्डाने विविध झोनमधील अतिरिक्तकर्मचारी गोठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील एक हजार कर्मचारी आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील ४०० कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत. खासगीकरणामुळे प्रवाशांना सुविधांऐवजी मनस्तापच होत आहे. रेल्वेने पेंट्रीकारचा ताबा कंत्राटदारांना दिला आहे. परंतु संबंधित कंत्राटदारांकडून प्रवाशांना निकृष्ट भोजनाचा पुरवठा होत असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच प्रवासी गोंधळ घालताना दिसतात. ही बाब केवळ खासगीकरणामुळे होत असून रेल्वे प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.रेल्वेत एखादा अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाला की त्याचे पद गोठविण्यात येते. सुरक्षेला धारेवर धरून हे काम होत असल्यामुळे त्याचा मोठा धोका देशाला पत्करावा लागणार आहे. अपेक्षेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत आहेत. ही बाब रेल्वेच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी कर्मचाऱ्यांची जागा भरून निघू शकत नाही. -प्रवीण डबली, माजी सदस्य, झेडआरयूसीसी, दपूम रेल्वे