शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाजांच्या विळख्यात उपराजधानी; सहा दिवसात १३५ कोटींची फसवणूक उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 07:00 IST

Nagpur News fraud कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत.

ठळक मुद्दे कंगाल झाल्यावरच पुढे आल्या घटना

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत. गेल्या सहा दिवसात नोंद झालेल्या दोन प्रकरणात १३५ कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. हा आकडा आर्थिक गुन्हेगारीचे गांभीर्य विषद करणारा आहे.

आर्थिक घोटाळ्यांसाठी नागपूरचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे. कळमना अर्बन, वासनकर, श्री सूर्या, समीर जोशी, रवी जोशी, झामरे, झाम, नवाेदय बँक, मैत्रेय पत संस्था, चिमणकर यांच्यासारख्यांनी यापूर्वी गरीब व मध्यमवर्गीयांचे हजारो-लाखो रुपये हडप केले आहेत. गुंतवणुकीत भक्कम नफा मिळविण्याच्या लालसेने परिश्रमपूर्वक मिळवलेले धन नागरिकांनी या ठगबाजांच्या हाती सोपवले. कोणी अचल संपत्ती विकून तर कुणी मुलांच्या शिक्षणाचा किंवा मुला-मुलीच्या लग्नासाठी बचत केलेली रक्कम अशा प्रकरणात गमावली. विशेष म्हणजे, हे सगळे प्रकरण गुंतवणूकदार रस्त्यावर उतरल्यावरच उघडकीस आले आहेत. पोलिसांनी स्वत:हून अशा घोटाळेबाजांवर अंकुश लावला, असे एकही प्रकरण गेल्या दोन दशकात दिसून आले नाही, हे विशेष. गेल्या सहा दिवसात नोंद झालेले दोन प्रकरण अशाच स्वरूपाचे आहेत.

यातील पहिले प्रकरण सीताबर्डी येथील आहे. गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याज आणि बोनस देण्याची लालूच दाखवून सुशिल कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार भरत साहू यांनी नागरिकांना ३५ कोटी रुपयांनी ठगवले आहे. कोल्हे बंधूंनी सुरुवातीला इंदोरा येथे कार्यालय थाटले. तीन वर्षे येथे एमएलएम कंपनी चालवली. त्यानंतर २०१८मध्ये सिव्हील लाईन्स येथील उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये एजीएम कार्पोरेशन चालवत होते. प्रारंभी त्यांनी स्थानिक गुंतवणूकदारांना कंपनीशी जोडले आणि हळूहळू अन्य राज्यातही आपले जाळे पसरवले. डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर अनेकांना यात सहभागी करून घेतले. तारांकित हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून आपले नेटवर्क महाराष्ट्रापासून ते हिमाचल, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब आदी राज्यात वाढवले. नागपूरच्या धर्तीवर त्यांनी सर्वच राज्यांमधील गुंतवणूकदारांना प्रारंभावस्थेत लाभ दिला आणि नंतर व्यवसाय गुंडाळला. गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदार पोलिसांकडू चकरा मारत होते. मात्र, त्यांना आश्वासनापलिकडे काहीच प्राप्त झाले नाही. अखेर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे विनवणी केली तेव्हा ७ नोव्हेंबरला सीताबर्डी ठाण्यात ३५ कोटी रुपयांच्या ठगवणुकीचे प्रकरण नोंदवले गेले. प्रकरण तापले असल्याचे कळताच कोल्हे बंधू फरार झाले.

अशाच प्रकारचे प्रकरण विजय गुरुनुले याचे आहे. याने ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावावर जवळपास १०० कोटी रुपयांनी सामान्यांना गंडवले आहे. जवळपास पाच वर्षापासून गुरुनुले सामान्यांना विविध योजनांच्या नावाखाली आपल्या सापळ्यात अडकवत होता. प्रतापनगर ठाण्याजवळ मंगलमूर्ती चौकात त्याचे कार्यालय होते. गुरुनुले व त्याचे सहकारी बोगस योजना राबवून जोरदार प्रचार-प्रसार करत होते. यात अनेक लोक अडकले. पोलिसांनाही याचा अंदाजा आला नाही. विशेष म्हणजे गुरुनुले सर्वात आधी गुंतवणूकदारांना सुरक्षा म्हणून दुसऱ्याच्या मालकीच्या फ्लॅटची नोटरी करून देत होता. दरम्यान काही पीडित प्रतापनगर ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या सुस्तीची जाणिव असल्याने या पीडितांना मोठ्या अधिकाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी जावे लागले. त्यांनी अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना हकीकत सांगितली. रेड्डी आणि नुरूल हसन यांच्या निर्देशानुसार सीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर ठाण्यातील पोलीस दलाने गुरुनुलेच्या कार्यालयावर छापा मारला. एवढे सगळे झाल्यावरही गुरुनुलेची माणसे तक्रारकर्त्यांना रक्कम परत करण्यासोबतच अनेक प्रकारची प्रलोभने देत होते. परंतु, पोलीस अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि तक्रारकर्ता गणेश चाफले यांच्या हिमतीमुळे प्रकरण उघडकीस आले. १३ नोव्हेंबरला चाफले यांच्या तक्रारीवर केवळ १९.३५ लाख रुपयाच्या ठगवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला. सहा दिवसाच्या तपासानंतर ७० कोटीचा आकडा पुढे आला असून, १०० कोटीपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींना अटक झाली आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी