शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

उपराजधानीतील निराधारांच्या निधीत गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:15 IST

एकीकडे राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात ४०० रुपयाची वाढ करीत ती हजार रुपयापर्यंत पोहोचवून निराधारांना दिलासा दिला आहे. परंतु सध्याचे ६०० रुपये मानधन आहे तेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देप्रशासन म्हणते बँकेत निधी पाठवला पण लाभार्थ्यांच्या खात्यात जमाच नाही

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात ४०० रुपयाची वाढ करीत ती हजार रुपयापर्यंत पोहोचवून निराधारांना दिलासा दिला आहे. परंतु सध्याचे ६०० रुपये मानधन आहे तेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मार्च ते मे या तीन महिन्याचे मानधन यंदा एकाच वेळी शासनाने जारी केले. प्रशासन म्हणते मानधन बँकेकडे वळते केले. बँक म्हणते जमाच झाले नाही. मार्च व मे महिन्याचे मानधन अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाही. लाभार्थी बँकेच्या चकरा मारत आहेत. मग हा निराधारांचा निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला असून निराधारांच्या निधीचा पुरता गोलमाल सुरू आहे.राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पात्रतेचे काही निकष आहेत. उदाहरणार्थ ती व्यक्ती किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी, ६५ वर्षांपेक्षा कमी वय नसावे आदी अशा लाभार्थ्यास दरमहा ६०० रुपये देण्यात येतात. यासोबतच श्रावण बाळ योजनाही राबवली जाते. नागपूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ९१ हजार ८०१ लाभार्थी आहेत. तर श्रावणबाळ योजनेचे १ लाख ३७ हजार ४४६ लाभार्थी आहेत. यामध्ये ९८,४७७ ग्रामीण भागात तर ३८,९६९ शहर भागात आहेत.या लाभार्थ्यांना फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे अनुदान मिळाले होते. मार्चपासूनचे अनुदान मिळाले नाही. दर महिन्याला लाभार्थी बँकेत जायचे पण अनुदान आलेच नसल्याचे त्यांना सांगितले जात होते. जून महिना सुरू झाल्यानंतरही लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. शासनाकडूनच ते यायचे होते. जून मध्ये मार्च, एप्रिल आणि मे अशा तिन्ही महिन्याचे अनुदान शासनाने एकाचवेळी मंजूर केले. हे अनुदान जवळपास २१ कोटी रुपये इतके होते. परंतु लाभार्थ्यांना केवळ एकाच महिन्याचे अनुदान मिळाले. तेही एप्रिल महिन्याचे मार्च आणि मे चे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. मग हा निधी गेला कुठे?

युनीयन बँक म्हणते, तपासून पाहावे लागेललाभार्थी असलेल्या एका बँकेत खरच निधी आला का, याबाबत काटोल रोड येथील युनियन बँक आॅफ इंडियात जाऊन तेथील शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनाही याबाबत स्पष्टपणे काही सांगता आले नाही. जो निधी आला तो जमा झाला. उर्वरित का जमा झाला नाही हे तपासून पहावे लागेल. असे त्यांचे म्हणणे होते.असा पोहोचतो लाभार्थ्यांपर्यंत निधीशासनाकडून मंजूर निधी हा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही. तो अगोदर अ‍ॅक्सिस बँकेला पाठवला जातो. बॅकेकडून तो लाभार्थ्यांचे खाते असलेल्या बँकेत जमा होतो. बँकेत जमा झाला की तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागामार्फत लाभार्थ्यांची यादी अ‍ॅक्सिस बँकेला पाठवली जाते.

तीन महिन्याचे मानधन एकाच वेळी पाठवलेमार्च महिन्यात काही अडचणी आल्याने निधी यायला वेळ लागला. परंतु मार्च आणि मे अशा तीन महिन्याचा एकत्रित निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. तो आमची मध्यवर्ती बँकिंग व्यवस्था असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेला पाठवला आहे. त्याचे कामही पूर्ण झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यात तो निधी जमाही झालेला असेल.उत्तम तोडसाम , तहसीलदार,संजय गांधी निराधार योजना, नागपूर

आमच्याकडे एकही केस पेंडिंग नाहीसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत यंदा तीन महिन्याचा निधी एकाच वेळी आला होता. लाभार्थ्यांची यादी टप्याटप्प्याने सादर झाली. त्यानुसार टप्याटप्प्याने प्रत्येक लाभार्थी ग्राहक असलेल्या बँकेला निधी पाठवला आहे. तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमाही झालेला असेल. सध्या आमच्याकडे एकही लाभार्थ्याची केस पेंडिंग नाही.संजय बर्मन , शाखा व्यवस्थापक, अ‍ॅक्सिस बँक, सिव्हील लाईन्स नागपूर

टॅग्स :Governmentसरकार