शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चार वर्षांत वाघांच्या हल्ल्यात १०१ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे, यातील १०१ जणांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी, २०१७ ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, पीडित किंवा त्यांच्या नातेवाइकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पशुधनाचे किती प्रमाणात नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. या संदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार चार वर्षांच्या कालावधीत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ नागरिकांचा बळी गेला. २०१७ मध्ये हा आकडा ५४ इतका होता. मात्र, २०२० मध्ये सर्वाधिक हल्ले झाले व त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना १२ लाख १६ हजार ८२२ रुपयांची मदत मिळाली.

वाघानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ६५ जणांना जीव गमवावा लागला, तर रानडुकरांनी २० व अस्वलांनी १५ नागरिकांचा बळी घेतला.

३० हजारांहून अधिक पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी

या कालावधीत ३० हजार ४३९ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले, तर ४६४ जखमी झाले. २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ९ हजार २५८ प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांची मदत करण्यात आली.

वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व मदत

वर्ष-मृत्यू- एकूण मदत

२०१७ - ५४ -४,३२,००,०००

२०१८ - ३३ -३,१२,००,०००

२०१९ - ३९ -५,८५,००,०००

२०२० - ८८ -१२,७५,००,०००

या प्राण्यांनी घेतले बळी

गवा -४

बिबट्या - ६५

वाघ - १०१

अस्वल- १५

हत्ती-२

नीलगाय-२

लांडगा -२

रानडुक्कर- २०

मगर -१

इतर-२