शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

चार वर्षांत वाघांच्या हल्ल्यात १०१ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे, यातील १०१ जणांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी, २०१७ ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, पीडित किंवा त्यांच्या नातेवाइकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पशुधनाचे किती प्रमाणात नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. या संदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार चार वर्षांच्या कालावधीत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ नागरिकांचा बळी गेला. २०१७ मध्ये हा आकडा ५४ इतका होता. मात्र, २०२० मध्ये सर्वाधिक हल्ले झाले व त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना १२ लाख १६ हजार ८२२ रुपयांची मदत मिळाली.

वाघानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ६५ जणांना जीव गमवावा लागला, तर रानडुकरांनी २० व अस्वलांनी १५ नागरिकांचा बळी घेतला.

३० हजारांहून अधिक पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी

या कालावधीत ३० हजार ४३९ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले, तर ४६४ जखमी झाले. २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ९ हजार २५८ प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांची मदत करण्यात आली.

वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व मदत

वर्ष-मृत्यू- एकूण मदत

२०१७ - ५४ -४,३२,००,०००

२०१८ - ३३ -३,१२,००,०००

२०१९ - ३९ -५,८५,००,०००

२०२० - ८८ -१२,७५,००,०००

या प्राण्यांनी घेतले बळी

गवा -४

बिबट्या - ६५

वाघ - १०१

अस्वल- १५

हत्ती-२

नीलगाय-२

लांडगा -२

रानडुक्कर- २०

मगर -१

इतर-२