शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत वाघांच्या हल्ल्यात १०१ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे, यातील १०१ जणांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी, २०१७ ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, पीडित किंवा त्यांच्या नातेवाइकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पशुधनाचे किती प्रमाणात नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. या संदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार चार वर्षांच्या कालावधीत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ नागरिकांचा बळी गेला. २०१७ मध्ये हा आकडा ५४ इतका होता. मात्र, २०२० मध्ये सर्वाधिक हल्ले झाले व त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना १२ लाख १६ हजार ८२२ रुपयांची मदत मिळाली.

वाघानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ६५ जणांना जीव गमवावा लागला, तर रानडुकरांनी २० व अस्वलांनी १५ नागरिकांचा बळी घेतला.

३० हजारांहून अधिक पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी

या कालावधीत ३० हजार ४३९ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले, तर ४६४ जखमी झाले. २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ९ हजार २५८ प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांची मदत करण्यात आली.

वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व मदत

वर्ष-मृत्यू- एकूण मदत

२०१७ - ५४ -४,३२,००,०००

२०१८ - ३३ -३,१२,००,०००

२०१९ - ३९ -५,८५,००,०००

२०२० - ८८ -१२,७५,००,०००

या प्राण्यांनी घेतले बळी

गवा -४

बिबट्या - ६५

वाघ - १०१

अस्वल- १५

हत्ती-२

नीलगाय-२

लांडगा -२

रानडुक्कर- २०

मगर -१

इतर-२