शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

विना विमा चार लाखावर दुचाकी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

शहर आरटीओ कार्यालयांतर्गत सर्व प्रकारची वाहने मिळून १३ लाख ५४ हजार १७४ वाहने आहेत. तर पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ४ लाख ४४ हजार ६५७ अशी एकूण १७ लाख ९८ हजार ८३१ वाहने आहेत. मात्र ही वाहने आरटीओ कार्यालयाच्या स्थापनेपासूनची आहेत. यामुळे यातील किती वाहने मोडकळीस निघाली असतील आणि किती वाहने रस्त्यावर असतील, याची माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, एकूण वाहनाच्या तुलनेत सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ११ लाख ३ हजार तर, पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ३ लाख ४४ हजार ३९६ दुचाकी आहेत. दोन्ही आरटीओ कार्यालये मिळून कारची संख्या १ लाख ६४ हजार ९८५ आहेत. ट्रकची संख्या १६ हजार ९८६, स्कूल बसची संख्या १ हजार ८७३ आहे. तज्ज्ञानुसार, बहुसंख्य चारचाकी वाहनांचे मालक नियमित विमा काढतात. परंतु दुचाकी वाहनांचा विमा काढण्यास अनेक चालक दुर्लक्ष करतात. वाहनचालक विमा काढतात किंवा नाही यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचा वॉच असतो. मात्र लाखो वाहनांची तपासणी करणे त्यांनाही मोठ्या अडचणीचे असते. याचा फायदा घेत, वाहनचालक विमा काढण्याकडे पाठ करतात. वाहनांचा विमा नसताना अपघात झाल्यास याचे परिणाम भयंकर आहेत. परंतु दुचाकी चालक यासंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. चार लाखापेक्षा अधिक दुचाकीचा विमा नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी यापेक्षा जास्त संख्या असण्याची शक्यता आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या चारचाकी वाहनांचाही विमा काढण्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमा नसल्याचे धोके

एखाद्या वाहनाचा विमा नसतानाही ते वाहन रस्त्यावर चालत असेल आणि अशात अपघात झाल्यास वाहनचालकाला मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. यासोबतच न्यायालयात खटला चालल्यानंतर दोषी आढळल्यास शिक्षा होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे विमा न काढताच वाहन चालविण्याचे संभाव्य धोके जास्त आहे. वाहनचालकांनी विमा असतानाच वाहन चालवावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

वाहनाचा विमा नसताना वाहन रस्त्यावर चालविणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनचालकाने असा प्रकार करू नये. वाहतूक विभागाकडून अशा वाहनांवर वारंवार कारवाई करण्यात येते. वाहन तपासणीत विमाही पाहिला जातो.

- सारंग अव्हाड, उपायुक्त पोलीस (वाहतूक)