शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विकास प्रकल्पातून चौफेर विकास ! महापालिका आयुक्त अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:12 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट काँक्रिट रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट , नागनदी सौंदर्यीकरण यासह विविध विकास प्रकल्प राबविले जात आहे. नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेता आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावयाचा आहे. त्यातच मोठ्या प्रकल्पात महापालिकेलाही वाटा द्यावयाचा असल्याने आर्थिक भार वाढला आहे. याचा शहरातील मूलभूत सुविधावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराचा चौफेर विकासाचा दावा केला आहे. त्यांच्याशी केलेली बातचित.

गणेश हूड /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट काँक्रिट रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट , नागनदी सौंदर्यीकरण यासह विविध विकास प्रकल्प राबविले जात आहे. नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेता आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावयाचा आहे. त्यातच मोठ्या प्रकल्पात महापालिकेलाही वाटा द्यावयाचा असल्याने आर्थिक भार वाढला आहे. याचा शहरातील मूलभूत सुविधावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराचा चौफेर विकासाचा दावा केला आहे. त्यांच्याशी केलेली बातचित.प्रश्न:आर्थिक स्थिती सावरण्यासाठी उपाययोजना आहेत का?अभिजित बांगर :राज्य सरकारकडून १५० कोटींचा विशेष निधी, जीएसटी अनुदान फरकाचे १०१ कोटी प्राप्त झाले. तसेच दर महिन्याच्या जीएसटी अनुदानात ३६ कोटींनी वाढ केली. यामुळे बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या मनपाला बळ मिळाले. मालमत्ताकर, पाणीपट्टी, नगररचना व बाजार विभागाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न आहे.प्रश्न:शहरातील कचऱ्याची समस्या दूर कशी करणार?अभिजित बांगर :घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासुन शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाईल. नागपूर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या ३०८ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीप्रश्न: पट्टे वाटपाचा प्रश्न कसा सोडविणार?अभिजित बांगर : राज्य सरकारने २०११ पूर्वी शासकीय जागांवर वसलेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला. नागपूर शहरातील दीड लाखांहून अधिक लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नासुप्र व महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकाना पट्टे वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. याला गती देण्याचा प्रयत्न आहे.प्रश्न:बंद पडलेली ग्रीन बस सेवा पुन्हा सुरू होणार का ?अभिजित बांगर : ग्रीन बस संचालनासाठी स्वीडनची कंपनी स्कॅनिया व महापालिका यांच्यात करार झाला आहे. यातील शर्तीनुसार स्कॅनिया आपली जबाबदारी दुसऱ्या ऑपरेटरक डे अटी व शर्तीनुसार हस्तांतरित करत असेल तर यावर विचार केला जाईल. यासाठी स्कॅनिया कंपनीची तयारी आहे. यावर लवकरच निर्णय होईल. नागपूर शहरात ग्रीन बस पुन्हा धावतील. पर्यावरण पूरक परिवहनाला प्रोत्साहन देण्याची महापालिकेची भूमिका आहे.प्रश्न : नागनदी सौंदर्यीकण प्रकल्प कधी सुरू होणारअभिजित बांगर : नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे यावर एकूण खर्च १२५२.३३ कोटी रुपये असून, ८५ टक्के कर्ज १०६४.४८ कोटी रुपये जपान सरकार उपलब्ध करून वित्तीय व्यवस्थापनाकरिता जिका (जपान) संस्थेतर्फे कर्ज उपलब्ध होणार आहे. जानेवारीअखेरीस जपानचे शिष्टमंडळ नागपूर दौऱ्यावर येत आहे. सहा महिने सर्वे करून ऑक्टोबर महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

 

 

 

टॅग्स :Abhijit Bangarअभिजित बांगरinterviewमुलाखत