शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

आगीत चार गुरांचा हाेरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागली आणि आत बांधलेल्या गुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागली आणि आत बांधलेल्या गुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे या आगीतील गाेठ्यातील चार गुरांचा हाेरपळून मृत्यू झाला. यात बैलजाेडीसह गाय व वासराचा समावेश आहे. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर शिवारात रविवारी (दि. २५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

गजानन नासरे, रा. भिष्णूर, ता. नरखेड यांची भिष्णूर शिवारात शेती आहे. शेतातच गाेठा असून, त्यांची सर्व जनावरे नेहमीप्रमाणे त्या गाेठ्यात बांधली हाेती. दरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्या गाेठ्याने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळीकडे धाव घेत आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. मात्र, आग नियंत्रणात येईपर्यंत आतील गुरांना गाेठ्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने आत असलेल्या बैलजाेडी, गाय व वासराचा हाेरपळून मृत्यू झाला.

शिवाय, या आगीत गाेठ्यातील शेतीपयाेगी साहित्य व गुरांचे वैरण पूर्णपणे जळाल्याने किमान १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती गजानन नासरे यांनी दिली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हिंमत बानाईत यांनी मृत गुरांची उत्तरीय तपासणी प्रक्रिया पार पाडली. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पाेलीस कर्मचारी अरविंद जाधव, जाेशी, तलाठी नाखले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. आग पीडित शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.