शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीचा जीवघेणा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:45 IST

शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेतकºयाचा गेला जीव भिवापूरच्या धामणगावातील घटना तीन दिवसांपासून सुरू होते उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनांद : शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सदर शेतकºयावर उपचार सुरू होता. त्यातच त्याचा मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.प्रभाकर बापूराव मिसाळ (५१, रा. धामणगाव - गवळी, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. दसºयाच्या दुसºया दिवशी, रविवारी (दि. १) ते मुलासह शेतात कपाशीच्या फवारणीसाठी गेले. त्यांनी फवारणीपंपाद्वारे फवारणी सुरू केली तर त्यांचा मुलगा पाणी आणून देत होता. अशात त्यांना भोवळ आली. वाढत्या तापमानात गर्मीमुळे भोवळ आली असावी म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्यांनी फवारणी सुरूच ठेवली. त्यातच त्यांच्या अंगावर फवारणीचे कीटकनाशक उडाले तसेच श्वसनाद्वारे आत गेले. त्यामुळे त्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी मुलाला सदर बाब सांगितली असता मुलाने त्यांना लगेच नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल)मध्ये हलविले. तेथे तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अशात त्यांचा मंगळवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला.प्रभाकर यांच्या मृत्यूची माहिती बुधवारी सकाळच्या सुमारास धामणगावसह परिसरात मिळताच शोककळा पसरली. प्रभाकर यांची धामणगाव शिवारात सात एकर शेती आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. प्रभाकर यांनी एका फायनान्स कंपनीसह सेवा सोसायटीकडून कर्जाची उचल केल्याची माहिती आहे.कपाशीची पाती आणि फुलांची गळ वाढलीयावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशी सध्या जोमात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढते तापमान आणि परतीच्या पावसामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी पाती आणि फुलांची गळ वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यातून वाचण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. ही फवारणीच शेतकºयांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. यवतमाळातील घटनेनंतर आता नागपूर जिल्ह्यातही अशाप्रकारची घटना घडली.