शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

फवारणीचा जीवघेणा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:45 IST

शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेतकºयाचा गेला जीव भिवापूरच्या धामणगावातील घटना तीन दिवसांपासून सुरू होते उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनांद : शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सदर शेतकºयावर उपचार सुरू होता. त्यातच त्याचा मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.प्रभाकर बापूराव मिसाळ (५१, रा. धामणगाव - गवळी, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. दसºयाच्या दुसºया दिवशी, रविवारी (दि. १) ते मुलासह शेतात कपाशीच्या फवारणीसाठी गेले. त्यांनी फवारणीपंपाद्वारे फवारणी सुरू केली तर त्यांचा मुलगा पाणी आणून देत होता. अशात त्यांना भोवळ आली. वाढत्या तापमानात गर्मीमुळे भोवळ आली असावी म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्यांनी फवारणी सुरूच ठेवली. त्यातच त्यांच्या अंगावर फवारणीचे कीटकनाशक उडाले तसेच श्वसनाद्वारे आत गेले. त्यामुळे त्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी मुलाला सदर बाब सांगितली असता मुलाने त्यांना लगेच नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल)मध्ये हलविले. तेथे तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अशात त्यांचा मंगळवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला.प्रभाकर यांच्या मृत्यूची माहिती बुधवारी सकाळच्या सुमारास धामणगावसह परिसरात मिळताच शोककळा पसरली. प्रभाकर यांची धामणगाव शिवारात सात एकर शेती आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. प्रभाकर यांनी एका फायनान्स कंपनीसह सेवा सोसायटीकडून कर्जाची उचल केल्याची माहिती आहे.कपाशीची पाती आणि फुलांची गळ वाढलीयावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशी सध्या जोमात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढते तापमान आणि परतीच्या पावसामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी पाती आणि फुलांची गळ वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यातून वाचण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. ही फवारणीच शेतकºयांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. यवतमाळातील घटनेनंतर आता नागपूर जिल्ह्यातही अशाप्रकारची घटना घडली.