शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

केंद्राच्या पत्राचा राज्य शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 10:43 IST

केंद्र शासनाने जैवविविधता नोंदवहीचा मोबदला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे याबाबत कुठलेच दिशानिर्देश जारी झाले नसल्याने काम थंडबस्त्यात गेले आहे.

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे स्थापन जैवविविधता समित्यांमार्फत स्थानिक पातळीवरील जैवविविधता नोंदणीचे काम सामाजिक संस्थांद्वारे करण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून निधीच न मिळाल्याने नोंदणीचा पैसा थकला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने जैवविविधता नोंदवहीचा मोबदला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे याबाबत कुठलेच दिशानिर्देश जारी झाले नसल्याने काम थंडबस्त्यात गेले आहे. दुसरीकडे जबाबदारी असलेल्या जैवविविधता महामंडळानेही हात वर केल्याचे दिसून येत आहे.जैवविविधता मंडळाद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जैवविविधता नोंदवही तयार करण्यात येते. संस्थांच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या निगराणीखाली हे सामाजिक संस्थांच्या मार्फत कामाची अंमलबजावणी केली जाते. स्थानिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, पाण्याचे स्रोत आदींची नोंद केली जाते. जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत मंडळाच्या माध्यमातून २०१९ मध्ये लोक जैवविविधता नोंदवहीचे अभियान राबविण्यात आले. मंडळानेही सर्वेक्षणाचे काम सामाजिक संस्थांकडून करवून घेतले. मात्र शासनाकडून निधीच न मिळाल्याने संस्थांच्या कामाचा पैसा रखडला. मंडळाने निधीसाठी राज्य शासनाकडे विचारणा करीत स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या निधीतून जैवविविधता नोंदवहीचा मोबदला देण्याचे निवेदन दिले होते. मात्र संस्थांकडे निधीच नसल्याने त्यांनीही हात वर केले. याबाबत ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत सामाजिक संस्थांनी पाठपुरावा केला.

या वृत्तामुळे यंत्रणा कामाला लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनानेही या महत्त्वपूर्ण कामाचा मोबदला व नोंदवहीचे उरलेले काम १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाला दिले आहेत. मात्र राज्याच्या मंत्रालयाने यासंदर्भात कोणतेही दिशानिर्देश जारी केले नाही. सूत्राच्या माहितीनुसार ग्रामपंचायतांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र राज्याकडून कुठलेही दिशानिर्देश नसल्याने व्यवस्थापन समित्यांनीही नोंदवहीच्या मोबदल्याची पूर्तता करण्यास मनाई केली आहे. नोंदवहीचा मोबदला न मिळाल्याने सामाजिक संस्था अडचणीत आल्या आहेत. अनेक संस्थांनी याबाबत लोकमतला माहिती दिली.जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संस्थानागपूर जिल्ह्यात अशा ५० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांनी जैवविविधता नोंदवहीचे काम केले आहे. राज्यभरातही अशा अनेक संस्थांचा मोबदला रखडला असून त्यांना निधीची प्रतीक्षा लागली आहे.मंडळाच्या कामावरही संशयस्वराज्य संस्थांच्या जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्यानंतर त्यांचे खाते उघडले जाते व जैवविविधता मंडळ या खात्यावरच निधी जमा करते. मंडळाने जैवविविधता नोंदवहीचे काम करवून घेतले पण पैसा जमा केला नसल्याची तक्रारही करण्यात येत असून मंडळानेच पैसा रोखल्याचा संशय सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार