शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्यांनी झाडांची केली कत्तल

By admin | Updated: March 8, 2017 02:39 IST

एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात मातीबांध तयार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या मदतीने झाडांची कत्तल

भ्रष्टाचाराचा आरोप : गावकऱ्यांची वरिष्ठांकडे लेखी तक्रार नागपूर : एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात मातीबांध तयार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या मदतीने झाडांची कत्तल केल्याच्या गंभीर आरोपासह काही गावकऱ्यांनी थेट राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) आणि पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, या लेखी तक्रारीसोबत ३५ गावकऱ्यांच्या स्वाक्षरीसह नावांची यादी जोडण्यात आली आहे. आरएफओ पी. एस. पाखले असे त्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून, ते सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पवनी (बफर झोन) येथे कार्यरत आहेत. गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, आरएफओ पाखले यांनी मागील २०१६ मध्ये पिपरिया येथील नर्सरीतील पॉलीबॅग भरण्यासाठी सरकारी जंगलातील रेती व मातीचा उपयोग करून त्याचे लाखो रुपये स्वत: हडप केले. तसेच नेटचे शेड तयार करण्यासाठी जंगलातील हिरवे बांबू तोडून त्याचा उपयोग करण्यात आला. शिवाय मजुरांना नियमाप्रमाणे ३०३ रुपये मजुरी देणे आवश्यक असताना त्यांना हुंडा पद्घतीने मजुरी देऊन त्यात लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोबतच १ जुलै २०१६ रोजी राज्यभरात राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथे १० हजार खड्डे खोदण्यात आले होते. परंतु त्यातही पाखले यांनी मजुरांना खड्डा खोदण्याचा दर जास्त असताना केवळ १० रुपये प्रति खड्डा मजुरी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय जंगलात आवश्यकता नसताना तब्बल २० ते २५ बोअरवेल खोदून त्यात ठेकेदारांकडून कमिशन वसूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा अनेक गंभीर आरोपांसह गावकऱ्यांनी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या गंभीर आरोपानंतरही वनभवन आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने गावकऱ्यांच्या त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.(प्रतिनिधी) आरएफओ म्हणतात, सर्व आरोप खोटे यासंबंधी वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस. पाखले यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेतली असता, त्यांनी गावकऱ्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. शिवाय ते पुढे म्हणाले, गावकऱ्यांच्या या तक्रारीनंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील सहायक वनसंरक्षक भागवत यांनी विचारपूस केली. परंतु त्यांना काहीही तथ्य आढळून आले नाही. उलट तक्रारीतील गावकऱ्यांची काही नावे आणि स्वाक्षऱ्या या खोट्या असल्याचाही यावेळी पाखले यांनी आरोप केला.