शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वन-पर्यावरणाच्या नियमांची रेल्वेकडूनच पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वनक्षेत्रात जाणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकसारखा कचरा फेकण्यासाठी बंधन असले तरी वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे डब्यांमधून सर्रास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वनक्षेत्रात जाणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकसारखा कचरा फेकण्यासाठी बंधन असले तरी वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे डब्यांमधून सर्रास प्लास्टिक कंटेनर फेकले जातात. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका संभवतो. मात्र, असे असतानाही रेल्वेने यासंदर्भात कसलीही दखल घेतलेली नसल्याने ही बाब धोकादायक ठरत आहे.

अनेक लोहमार्ग वनक्षेत्रातून जातात. अनेक मार्गांचे नॅरोगेजवरून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हे मार्गही वनक्षेत्रातूनच जातात. नव्याने आखण्यात येत असलेले मार्गही वनक्षेत्रातून जात आहेत. मात्र, वन क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे प्रवासात रेल्वेकडून कसलीही खबरदारी घेतली जात नाही. पर्यायाने खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कंटेनर, पाण्याच्या बाटल्या सर्रास खिडकीमधून बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असा कचरा साचलेला नेहमीच दिसून येतो. वनक्षेत्रात रेल्वे डब्यांमधून फेकल्या जाणाऱ्या पाकिटातील अन्न खाण्यासाठी डुक्कर, हरीण, कोल्हे, रानकुत्रे आदी प्राणी तसेच पक्षीही येतात. परिणामी रेल्वे ट्रॅकवर वन्यजीवांचा बळी जातो.

होशंगाबादच्या प्रवासात इटारसीच्या रेल्वे थांब्यावर पेन्ट्री असल्याने प्रवाशांना पाकिटात अन्न दिले जाते. पुढच्या प्रवासात होशंगाबाद, सातपुडा परिसरात जंगलच आहे. जेवणानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर अन्नाची पाकिटे, कंटेनर फेकले जातात. असाच प्रकार अन्य ठिकाणीही आहे. एसी कोचमध्ये असा प्रकार घडत नसला तरी साधारण श्रेणींच्या डब्यांमध्ये हा प्रकार घडतो. रेल्वे प्रवाशांकडून स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. रेल्वेचेही याबाबतीत फारसे नियंत्रण नाही. यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असली, तरी ती फारशी गांभीर्याने घेतली जात नाही, ही खरी अडचण आहे.

...

कोट

रेल्वे प्रवाशांकडून नियमभंग होत असतानाही वन विभाग आणि रेल्वे खाते गंभीर नाही. एकीकडे वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी नियम आखले जात असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. परिणामी रेल्वे ट्रॅकवर वन्यजीवांचे मृत्यू होत आहेत. वन विभाग आणि रेल्वे खात्याने यावर संयुक्तपणे मार्ग काढावा. संबंधित प्रवाशांना दंड केला जावा. रेल्वे डब्यांमध्ये कचऱ्यासाठी कंटेनर ठेवले जावे.

- प्रफुल्ल भांबुरकर, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, महाराष्ट्र समन्वयक

...

कोट

हा विषय गंभीर आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी लाईन चेकिंग करताना याची दक्षता घ्यायला हवी. वनक्षेत्रात त्यांच्याकडून स्वच्छता होणे अपेक्षित आहे. यात काही तांत्रिक अडचणी असल्या तरी मार्ग काढता येईल. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल.

- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)