शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वन विभाग ‘जय’साठी अस्वस्थ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 02:38 IST

मागील चार महिन्यांपूर्वी अचानक गायब झालेल्या उमरेड-कऱ्हांडला येथील ‘जय’ चा वन विभागाला अजूनपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही.

शोधमोहिम थंडावली : संशयित आरोपींची जामिनावर सुटका नागपूर : मागील चार महिन्यांपूर्वी अचानक गायब झालेल्या उमरेड-कऱ्हांडला येथील ‘जय’ चा वन विभागाला अजूनपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. यामुळे वन विभाग चांगलाच अस्वस्थ झाला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी भंडारा व नागपुरातील वन विभागाच्या पथकाने पवनीशेजारच्या कोदुली येथील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अनावश्यक गुन्हे दाखल केल्याची घटना पुढे आली आहे. किसन इस्तारी समर्थ व मधुकर मुरलीधर हटवार अशी त्या व्यक्तींची नावे आहेत. माहिती सूत्रानुसार वन विभागाला १८ एप्रिल २०१६ रोजी ‘जय’ चे शेवटचे लोकेशन किसन समर्थ यांच्या शेतात सापडले आहे. शिवाय हटवार यांनी कधीकाळी जंगली सशाची शिकार केली होती. केवळ या दोन गोष्टीच्या आधारे वन विभागाने मंगळवारी एखाद्या सराईत शिकाऱ्याप्रमाणे या दोन्ही लोकांच्या घरावर धाडी घालून त्यांना ताब्यात घेतले. एवढेच नव्हे तर त्यांची रात्रभर कसून चौकशीही केली. मात्र शेवटी त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही आणि न्यायालयाने बुधवारी दोघांचीही जामिनावर सुटका केली. मात्र त्याचवेळी या घटनेने वन विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला आहे. वन विभागाकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना या लोकांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईबद्दल स्थानिक गावकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहे. शिवाय वन विभाग ‘जय’ च्या शोधमोहिमेतील अपयश लपविण्यासाठी अशा खोट्या कारवाई करीत असल्याचाही आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, ‘जय’ हा वन विभागाच्या चांगल्याच मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे ‘जय’ चा शोध घेणे वन विभागापुढे एक आव्हान ठरले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात ‘जय’ हा सुरक्षित असून तो परत येणारच! असे जाहीर केल्याने वन विभागावर अधिकच दडपण वाढले आहे. जाणकारांच्या मते, वन विभागाच्या अशा कारवायांमुळे ‘जय’ ची शोधमोहिम भरकटली जात आहे. माहिती सूत्रानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांच्या निर्देशानुसार मागील महिनाभरापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेली शोधमोहिम थंडावली आहे. (प्रतिनिधी)