अधिकारी हादरले : घटना दडपण्याचा प्रयत्न नागपूर : एकीकडे कळमेश्वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गायब झाल्याची जोरदार चर्चा असताना, नागपूर वन विभाग मात्र येथील सर्व वाघ सुरक्षित असल्याचे सांगत आहे. मात्र या संपूर्ण घटनेने अख्खा वन विभाग हादरला आहे. नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. के. महाजन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कातलाबोडी जंगलातील सर्व वाघ सुरक्षित असून, त्यांचे छायाचित्रही वन विभागाकडे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीनुसार सर्व वाघ सुरक्षित असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे, परंतु वन विभागाने अजूनपर्यंंत त्या दिशेने कोणतीही चौकशी सुरू केल्याचे दिसून येत नाही. केवळ दक्षता विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रदीप मसराम यांनी चार दिवसांपूर्वी एका संयशिताला ताब्यात घेऊन, त्याची दिवसभर कसून चौकशी केली होती. परंतु त्यात त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. जाणकारांच्या मते, या जंगलात एक वाघ, एक वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा अधिवास आहे. मात्र गत दोन ते अडीच महिन्यापासून त्यापैकी एक वाघ अचानक गायब झाल्याची सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
वन विभाग म्हणतो, ‘वाघ’ सुरक्षित
By admin | Updated: May 16, 2014 00:47 IST