शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कचरा संकलन कंपन्यांना सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:08 IST

महिनाभरात ९० टक्के ओला व सुका कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०२१ ...

महिनाभरात ९० टक्के ओला व सुका कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहू नये, यासाठी मनपा प्रशासन कामाला लागले आहे. परंतु कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या दोन्ही कंपन्यांमुळे मनपाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. प्रयत्नानंतरही सध्या ओला व सुका कचरा ४० ते ५० टक्के वेगवेगळा संकलित केला जातो. याचा विचार करता प्रशासनाने संबंधित कंपन्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत महिनाभरात ९० टक्के ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे उद्दीष्ि दिले आहे. यात यश न आल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे. कंपन्यांना करारातील शर्तीचे उल्लंघन केल्याने कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

१६ नोव्हेंबर २०१९ ला नागपुरात कचरा संकलनासाठी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी एजी कंपनीला प्रति टन १९५० या दराने तर झोन ६ ते १० मधील जबाबदारी बीव्हीजी कंपनीला प्रति टन १८०० रुपये दराने दिली आहे. प्रथमच नियम बाजूला सारून दर निश्चित करण्यात आले. सत्तापक्षाने या कंपन्यांना कंत्राट देताना निविदातील शर्तीचे समर्थन केले होते. परंतु आता त्यांची भूमिका बदलली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाचा विरोध असूनही कचरा संकलनाचे दर सत्तापक्षाच्या दबावात निश्चित करण्यात आले होते. वास्तविक नियमानुसार दोन्ही कंपन्यांचे समान दर निश्चित होणे अपेक्षित होते.

विशेष म्हणजे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. दोन्ही कंपन्यांना कामाचा अहवाल मागण्यात आला. भाजपाचे शहर अध्यक्ष व आमदार ज्येष्ठ नगरसेवक म्हणून प्रवीण दटके मनपात सक्रिय दिसत आहेत. कचऱ्यासंदर्भात ते उत्सुकता दाखवीत आहेत. अधिकाऱ्यांमुळे कंपन्यांना अभय मिळत असल्याचा ते खुलेआम अधिकाऱ्यांवर आरोप करतात. वास्तविक सत्तापक्षाच्या मर्जीमुळेच कचरा संकलन कंपन्यांची मनमानी सुरू आहे.

....

मनपाने स्वत: जबाबदारी घ्यावी

विरोधी नगरसेवकांसोबतच काही अधिकारी कचरा संकलन मनपाने आपल्या अधिकारात घ्यावे, अशा बाजूने आहेत. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी कनक कंपनीचा करार संपुष्टात आणण्यापूर्वी झोनस्तरावर वेगवेगळा कचरा संकलित करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु सत्तापक्षाने दोन कंपन्या नियुक्त करण्याचा प्रस्ताव आणला.