शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अन्नसुरक्षेने केला अपेक्षाभंग

By admin | Updated: May 21, 2014 01:13 IST

एखादी चांगली योजना राबविताना घाई झाली तर तिचे कसे खोबरे होते याचे उदाहरण द्यायचे असेल तर केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेचे देता येईल. गोरगरिबांना स्वस्त धान्य

पूर्वीपेक्षा धान्य कमी : बाजारभावाचा वाढता बोझा

चंद्रशेखर बोबडे - नागपूर

एखादी चांगली योजना राबविताना घाई झाली तर तिचे कसे खोबरे होते याचे उदाहरण द्यायचे असेल तर केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेचे देता येईल. गोरगरिबांना स्वस्त धान्य देऊन त्याचा राजकीय लाभ पदरी पाडण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पूर्वीपेक्षा कमी धान्य मिळत असल्याने गोरगरीब नाराज झाले आणि त्यांनी त्यांचा असंतोष मतपेटीतून व्यक्तही केला. गोरगरीब जनतेला अत्यल्प दरात धान्य देण्यासाठी केंद्राने अन्नसुरक्षा योजना जाहीर केली. पाच रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो धान्य देण्याची तरतूद या योजनेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा झाली आणि आवश्यक यंत्रणाच उभी न करता घाईगडबडीत अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे त्यातील अनेक त्रुटी तशाच राहिल्या. आता टप्प्याटप्प्प्याने यातील उणिवा पुढे येत आहेत. या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी ही धान्य वाटपाच्या निकषाची आहे. योजना सुरू होण्यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांना २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ ३५ किलो धान्य वाटप केले जात होते. एका कुटुंबाची महिनाभराची सोय यातून सहज होत होती. बाजारातून धान्य खरेदी करण्याची गरज भासत नव्हती. अन्न सुरक्षा योजनेत प्रति कार्ड प्रति व्यक्ती पाच किलो याप्रमाणे धान्यवाटप सुरू झाले. कार्ड धारकांवर संकट एका कार्डवर दोनच व्यक्तींची नावे असेल तर त्याला दहा किलो धान्य मिळू लागले. पूर्वी याच कुटुंबाला ३५ किलो धान्य मिळत होते. आता ते कमी मिळायला लागल्याने त्यांना खुल्या बाजारातून चढ्या दराने खरेदी करावे लागते. अन्नसुरक्षा योजनेमुळे स्वस्त दरात धान्य मिळाले पण ते कमी मिळत असल्याने नाराजी आहे. अन्नसुरक्षेमुळे प्रत्येक जिल्ह्याला मिळणारा धान्य कोटाही कमी झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेची अंमलबजावणी करतानाच ही अडचण संबंधितांच्या नजरेस आणून देण्यात आली होती. पण अंमलबजावणीच्या घाईत त्याकडे दुर्लक्ष झाले. जिल्ह्यात सध्या १ लाख १० हजारावर शिधापत्रिकाधारक योजनेसाठी पात्र ठरले आहेत. अलीकडेच वगळण्यात आलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांचाही त्यात समावेश करण्यात आला.(प्रतिनिधी)