शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

सरकारी वकिलांनो नियम पाळा !

By admin | Updated: June 2, 2016 03:14 IST

अनेक सरकारी वकील न्यायालयात व कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहात नसल्याचे, न्यायालयात वेळेवर येत नसल्याचे आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

शासनाने दिली समज : अनेकदा न्यायालयात राहतात अनुपस्थितराकेश घानोडे  नागपूरअनेक सरकारी वकील न्यायालयात व कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहात नसल्याचे, न्यायालयात वेळेवर येत नसल्याचे आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील काही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी यासंदर्भात शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन सरकारी वकिलांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. त्याद्वारे सरकारी वकिलांना नियम पाळण्याची समज देण्यात आली आहे.राज्य शासनाने उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालये, विविध न्यायाधिकरणे यासह अन्य न्यायालयांमध्ये शासनाशी संबंधित प्रकरणांचे कामकाज पाहण्यासाठी वकील नियुक्त केले आहेत. या वकिलांना आकर्षक पारिश्रमिक दिले जाते. असे असतानाही अनेक सरकारी वकील नियम पाळत नाहीत. त्यांच्या बेशिस्तीमुळे प्रकरणांचे कामकाज विनाकारण लांबते. न्यायालयाच्या अमूल्य वेळेचा अपव्यय होतो. तसेच, दूर अंतरावरून आलेल्या पक्षकारांची आर्थिक हानी होते व त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. संबंधित परिपत्रक शासनाच्या विधी व न्याय विभागाने ३० मे रोजी जारी केले आहे. न्यायालयीन प्रकरणे विनाविलंब चालविण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात व कार्यालयात वेळेवर आणि पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची सूचना परिपत्रकात करण्यात आली आहे. राज्याचे महाधिवक्ता, सर्व विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयांतील सरकारी वकील आदींकडे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. नियम पाळणे वकिलांचे कर्तव्यनियम पाळणे सरकारी वकिलांचे कर्तव्यच आहे. यामुळे त्यांनी न्यायालयात व कार्यालयात वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी खटले वेगात निकाली काढण्यासाठी न्यायालयाला सहकार्य केले पाहिजे. शासनाच्या परिपत्रकाचे स्वागत करतो. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकिलांना वेळेवर उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. - अ‍ॅड. विजय कोल्हे, मुख्य जिल्हा सरकारी वकील.सरन्यायाधीशांच्या चिंतेचे महत्त्व कमी करणारी कृतीप्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या व त्यातील पीडितांच्या व्यथेवर देशाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी अलीकडेच चिंता व्यक्त केली होती. यामुळे ही समस्या निकाली काढण्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारी वकिलांचे बेशिस्त वागणे सरन्यायाधिशांच्या चिंतेचे महत्त्व कमी करणारे आहे. राज्यात उच्च न्यायालयापेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायालयांमध्ये सध्या १० लाख ६६ हजार १२८ दिवाणी व १९ लाख २६ हजार ६१९ फौजदारी अशी एकूण २९ लाख ९२ हजार ७४७ प्रकरणे प्रलंबित आहेत. ‘नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड’वर ही आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे.