शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

नागपूर कराराचे पालन करा, अधिवेशन नागपुरात घ्या; विदर्भवाद्यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 20:24 IST

Nagpur News नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

 

नागपूर : नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. दरम्यान, हे अधिवेशन मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

- अधिवेशनाबाबत शासनाचे अजूनही काही ठरलेले नाही. वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. परंतु सध्या असे म्हणता येईल की, नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच व्हायला हवे. राज्य शासनानेसुद्धा कराराचे पालन करीत नागपुरात अधिवेशन घ्यावे आणि येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.

- वामनराव चटप, माजी आमदार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते

 

- कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अपेक्षेमुळे दरवर्षी हिवाळ्यात होणारे अधिवेशन नागपूरला न होता परत मुंबईला डिसेंबर महिन्यात होत आहे. मागील वर्षीसुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले नाही. वैधानिक मंडळाची स्थापना नसल्यामुळे माननीय राज्यपालांद्वारे निधी वाटपाचे निर्देशसुद्धा शासनाला दिले जात नसल्याने, विदर्भ-मराठवाड्यातील विकासाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात झाल्यास महाराष्ट्रातील मागासलेले प्रदेश विदर्भ व मराठवाड्याला न्याय मिळू शकेल.

- डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

- नागपूर कराराचा सन्मान म्हणून विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे. विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व आहे. नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरविले जाते, तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल तर विदर्भाचा विकास होणारच नाही.

- आशिष देशमुख, माजी आमदार

-- नागपुरातील अधिवेशन वारंवार मुंबईला पळवून नागपूर कराराचे उल्लंघन करण्याचे काम राज्य सरकार वारंवार करीत आहे. हा विदर्भावर मोठा अन्याय आहे. यांच्या अशा विदर्भविरोधी धोरणामुळे वारंवार नागपूरसहित विदर्भावर अन्याय करण्याचे काम हे सरकार करीत आहे. जेव्हापासून राज्यात तिघाडी सरकार अस्तित्वात आले, तेव्हापासून पहिले अधिवेशन सोडता एकही अधिवेशन या नागपूर शहरात झाले नाही.

- कृष्णा खोपडे, आमदार, भाजप

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन