शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

नागपूर कराराचे पालन करा, अधिवेशन नागपुरात घ्या; विदर्भवाद्यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 20:24 IST

Nagpur News नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

 

नागपूर : नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. दरम्यान, हे अधिवेशन मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

- अधिवेशनाबाबत शासनाचे अजूनही काही ठरलेले नाही. वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. परंतु सध्या असे म्हणता येईल की, नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच व्हायला हवे. राज्य शासनानेसुद्धा कराराचे पालन करीत नागपुरात अधिवेशन घ्यावे आणि येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.

- वामनराव चटप, माजी आमदार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते

 

- कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अपेक्षेमुळे दरवर्षी हिवाळ्यात होणारे अधिवेशन नागपूरला न होता परत मुंबईला डिसेंबर महिन्यात होत आहे. मागील वर्षीसुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले नाही. वैधानिक मंडळाची स्थापना नसल्यामुळे माननीय राज्यपालांद्वारे निधी वाटपाचे निर्देशसुद्धा शासनाला दिले जात नसल्याने, विदर्भ-मराठवाड्यातील विकासाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात झाल्यास महाराष्ट्रातील मागासलेले प्रदेश विदर्भ व मराठवाड्याला न्याय मिळू शकेल.

- डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

- नागपूर कराराचा सन्मान म्हणून विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे. विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व आहे. नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरविले जाते, तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल तर विदर्भाचा विकास होणारच नाही.

- आशिष देशमुख, माजी आमदार

-- नागपुरातील अधिवेशन वारंवार मुंबईला पळवून नागपूर कराराचे उल्लंघन करण्याचे काम राज्य सरकार वारंवार करीत आहे. हा विदर्भावर मोठा अन्याय आहे. यांच्या अशा विदर्भविरोधी धोरणामुळे वारंवार नागपूरसहित विदर्भावर अन्याय करण्याचे काम हे सरकार करीत आहे. जेव्हापासून राज्यात तिघाडी सरकार अस्तित्वात आले, तेव्हापासून पहिले अधिवेशन सोडता एकही अधिवेशन या नागपूर शहरात झाले नाही.

- कृष्णा खोपडे, आमदार, भाजप

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन