शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

‘फ्लॅशर’चा मोह आवरेना

By admin | Updated: December 10, 2015 02:56 IST

केंद्रीय मोटार वाहन नियमाच्या नव्या आदेशानुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री परिषदेचे सदस्य, मुंबई ...

राज्यमंत्री, अधिकाऱ्यांच्या वाहनांवर फिरता दिवा : परिवहन मंत्री कारवाईचा आदेश देतील का?सुमेध वाघमारे नागपूरलाल दिवा, अंबर दिवा आणि ‘फ्लॅशर’ संदर्भात राज्याच्या गृहविभागाने धोरण स्पष्ट केले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने वाहनांवरील दिव्यांच्या वापरण्यासंबंधी कठोर नियमावली तयार केली आहे. असे असताना हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने आलेले राज्यमंत्री, उच्चपदस्थ अधिकारी यांच्या वाहनांवरील फिरता दिवा (फ्लॅशर) कायम आहे. यामुळे शासनकर्तेच नियमांची अंमलबजावणी करीत नसल्यास सामान्यांकडून अपेक्षा करणे, कितपत योग्य असा प्रश्न विचारला जात आहे.केंद्रीय मोटार वाहन नियमाच्या नव्या आदेशानुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री परिषदेचे सदस्य, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, विधान सभेचे अध्यक्ष व विधान मंडळाचे विरोधी पक्ष नेता व कॅबिनेट मंत्री यांच्याच वाहनांच्या टपावर समोरच्या भागामध्ये फ्लॅशरसह लाल दिव्याला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायधीश, राज्यमंत्री, विधान परिषदेचे उपसभापती, विधानसभेचे उपाध्यक्ष, मुख्य सचिव, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, प्रशासनिक विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, उच्च न्यायालय मुंबईचे महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, ‘अ’ वर्ग महानगर पालिकेचे आयुक्त, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पोलीस महासंचालक व या दर्जाचे अधिकारी, मुख्य माहिती आयुक्त व लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांना विना फ्लॅशर लाल दिवा दिला आहे. या शिवाय, विना फ्लॅशर अंबर दिव्यांमध्ये सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, ‘ब’ वर्गाच्या महापालिकेचे महापौर, आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरली जाणारी वाहने व अग्निशमन वाहने आदींचा समावेश करण्यात आला आहे. मंत्र्यांच्या आदेशावरच कारवाई होऊ शकते मोटर वाहन कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई कशी करणार, या पेचात वाहतूक पोलीस व आरटीओचे अधिकारी सापडले आहेत. कायदा असूनही कारवाई करता येत नाही, असे चित्र आहे. यामुळे थेट मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्र्यांनी या संदर्भात आदेश दिल्यास कारवाई होऊन वचक बसेल, असे या क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञाचे मत आहे.