शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चढतोय घसरतोय..

By admin | Updated: January 7, 2015 01:15 IST

गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला

पाऱ्याला नाही थारानागपूर : गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला पारा २४ तासांत अपेक्षेहून कमी तापमानापर्यंत पोहोचत आहे. मंगळवारी नागपुरात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे सोमवारी किमान पारा १२.९ अंश सेल्सिअस इतका होता. दर दिवशी वातावरणात चढउतार होत असल्याने हवामानतज्ज्ञ चकित झाले आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २०१५ या वर्षातील सुरुवातीचे दोन दिवस पावसात गेले. तत्पूर्वी २९ डिसेंबर रोजी ४५ वर्षांतील सर्वात कमी इतक्या ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मध्यंतरी रात्रीचा गारठा थोडा कमी झाला होता व सरासरी १७ अंशांपर्यंत किमान पारा गेला होता. मात्र ढगाळ वातावरण दूर झाल्याने बोचरे वारे वाहण्यास परत सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवसभर शहरात बोचरे वारे वाहत होते. सोमवारी किमान १२.९ अंशांवर असणारा किमान पारा मंगळवारी अचानक ६.६ अंशांपर्यंत खाली घसरला. किमान तापमान सरासरीहून ६ अंशांनी कमी होते.मध्यप्रदेश, छत्तीसगड व विदर्भात थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. शिवाय उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत शीतलहर कायम राहील व पारा आणखी घसरू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)