शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 07:46 IST

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे.

ठळक मुद्देपुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीगतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे. गतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन उपाययोजनांसाठी सज्ज झाले आहे.

मध्य प्रदेशातून उगम पावणारी वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. नदीतीरावर ९९ गावे आहेत. त्यात भंडारा तालुक्यातील २९, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३, लाखांदूर ११ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेकदा वैनगंगेच्या कोपाचा सामना करावा लागला. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये आलेल्या महापुराने चार हजार लोक बाधित झाले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगेला महापूर आला होता. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा लगतच्या कारधा पुलावर सतत तीन दिवस पाणी होते. नदीतीरावरील गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने ४४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा यात बळी गेला होता.

आता पुन्हा पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. नदीतीरावर असलेल्या गावांमध्ये गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. प्रशासनाने पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजनेसाठी कंबर कसली आहे. सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मात्र यातील बहुतांश गावे वैनगंगेच्या रेड झोनमध्ये येत असून, त्या गावातील घरांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. गोसे प्रकल्पाने बाधित गावांचे पुनर्वसन झाले. परंतु लाखांदूर, पवनी, तुमसर तालुक्यातील नदीतीरावरील गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.

गावआपत्ती व्यवस्थापन आराखडा

महापुराची स्थिती निर्माण होणाऱ्या वैनगंगा नदीतीरासह इतर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. सरपंच, वायरमन, तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही समिती नागरिकांच्या मदतीला सज्ज राहणार आहे.

टॅग्स :floodपूर