शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 07:46 IST

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे.

ठळक मुद्देपुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीगतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे. गतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन उपाययोजनांसाठी सज्ज झाले आहे.

मध्य प्रदेशातून उगम पावणारी वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. नदीतीरावर ९९ गावे आहेत. त्यात भंडारा तालुक्यातील २९, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३, लाखांदूर ११ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेकदा वैनगंगेच्या कोपाचा सामना करावा लागला. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये आलेल्या महापुराने चार हजार लोक बाधित झाले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगेला महापूर आला होता. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा लगतच्या कारधा पुलावर सतत तीन दिवस पाणी होते. नदीतीरावरील गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने ४४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा यात बळी गेला होता.

आता पुन्हा पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. नदीतीरावर असलेल्या गावांमध्ये गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. प्रशासनाने पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजनेसाठी कंबर कसली आहे. सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मात्र यातील बहुतांश गावे वैनगंगेच्या रेड झोनमध्ये येत असून, त्या गावातील घरांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. गोसे प्रकल्पाने बाधित गावांचे पुनर्वसन झाले. परंतु लाखांदूर, पवनी, तुमसर तालुक्यातील नदीतीरावरील गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.

गावआपत्ती व्यवस्थापन आराखडा

महापुराची स्थिती निर्माण होणाऱ्या वैनगंगा नदीतीरासह इतर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. सरपंच, वायरमन, तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही समिती नागरिकांच्या मदतीला सज्ज राहणार आहे.

टॅग्स :floodपूर