शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 07:46 IST

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे.

ठळक मुद्देपुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीगतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे. गतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन उपाययोजनांसाठी सज्ज झाले आहे.

मध्य प्रदेशातून उगम पावणारी वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. नदीतीरावर ९९ गावे आहेत. त्यात भंडारा तालुक्यातील २९, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३, लाखांदूर ११ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेकदा वैनगंगेच्या कोपाचा सामना करावा लागला. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये आलेल्या महापुराने चार हजार लोक बाधित झाले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगेला महापूर आला होता. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा लगतच्या कारधा पुलावर सतत तीन दिवस पाणी होते. नदीतीरावरील गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने ४४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा यात बळी गेला होता.

आता पुन्हा पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. नदीतीरावर असलेल्या गावांमध्ये गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. प्रशासनाने पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजनेसाठी कंबर कसली आहे. सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मात्र यातील बहुतांश गावे वैनगंगेच्या रेड झोनमध्ये येत असून, त्या गावातील घरांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. गोसे प्रकल्पाने बाधित गावांचे पुनर्वसन झाले. परंतु लाखांदूर, पवनी, तुमसर तालुक्यातील नदीतीरावरील गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.

गावआपत्ती व्यवस्थापन आराखडा

महापुराची स्थिती निर्माण होणाऱ्या वैनगंगा नदीतीरासह इतर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. सरपंच, वायरमन, तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही समिती नागरिकांच्या मदतीला सज्ज राहणार आहे.

टॅग्स :floodपूर