शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जीव टांगणीला अन् खाट आडोशाला! जागले म्हणून वाचले; नागपूर जिल्ह्यातील पूरकहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 07:30 IST

Nagpur News घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली.

अभय लांजेवार

नागपूर : आपल्या घराच्या अवतीभवती पाणी वाढू शकते. घरातही पाणी शिरणार. धोका संभवू शकतो, असा अंदाज बांधून त्यांनी रात्री २ वाजेपर्यंत जागरण केले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली. एकूण पाच कुटुंबांतील २१ जणांनी सहीसलामत बाहेर पडत आप्तस्वकीयांकडे आसरा घेतला.

गुरुवारी मध्यरात्री ते अगदी पहाटे चार वाजेपर्यंत उमरेड तालुक्यातील बेला या गावानजीकच्या सावंगी (बुजरुक) येथे हा प्रसंग घडला. जुनापाणी (नागपूर ग्रामीण) येथील तलाव फुटला. वडगाव धरणाच्या पाण्याची पातळी वाढली. प्रशासकीय यंत्रणासुद्धा जागी होती. परिस्थिती समजून घेत प्रशासनाने वडगाव धरणाच्या पाण्याचा विसर्ग काढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे सावंगी बुजरुक येथील नाल्यालगतची पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. या सावंगी नाल्यालगत चंद्रभान वाघमारे, मुरलीधर हिवंज, सुंदराबाई हिवंज, शंकर वाघमारे, नारायण जयस्वाल या पाच कुटुंबीयांची घरे आहेत. पाणी वाढत असल्याचा धोका या कुटुंबीयांनासुद्धा लक्षात आला. पाचही कुटुंबीयांनी एकमेकांना धीर देत रात्र जागून काढण्याचे ठरविले. सायंकाळपासून पाणी सभोवताली वाढत होते. तासातासाला धोका अधिकच वाढत होता. अशातच घरातील महत्त्वपूर्ण साहित्य त्यांनी खाटेला दोरखंडाने बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण खाटच घराच्या आडोशाला बांधला.

पाचही कुटुंबांतील २१ जणांनी गावातील नातेवाइकांकडे पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुक्काम केला. या पाचही कुटुंबीयांच्या घरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. त्यांचे संपूर्ण घर चिखलमय झाले होते. अखेरीस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजतापासून नाल्यातील पाणी ओसरू लागले. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाचही कुटुंबीयांनी परतीची वाट धरली. तहसीलदार संदीप कुंडेकर, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी नितेश माने यांनी पाहणी करीत कुटुंबीयांचे कौतुक केले. त्यांना धीर दिला.

जागले म्हणून वाचले

सायंकाळपासूनच सभोवताली पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याचे लक्षात आल्याने पाचही कुटुंबीय सतर्क झालेत. मोठ्या हिमतीने शक्कल लढवित बहुतांश साहित्य खाटेला बांधले आणि स्वत: सुरक्षित ठिकाणी पोहोचले. कदाचित ते जागले नसते आणि पाणी अधिक प्रमाणात वाढले असते तर जीवघेणा सामना करावा लागला असता.

टॅग्स :floodपूर