शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जीव टांगणीला अन् खाट आडोशाला! जागले म्हणून वाचले; नागपूर जिल्ह्यातील पूरकहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 07:30 IST

Nagpur News घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली.

अभय लांजेवार

नागपूर : आपल्या घराच्या अवतीभवती पाणी वाढू शकते. घरातही पाणी शिरणार. धोका संभवू शकतो, असा अंदाज बांधून त्यांनी रात्री २ वाजेपर्यंत जागरण केले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली. एकूण पाच कुटुंबांतील २१ जणांनी सहीसलामत बाहेर पडत आप्तस्वकीयांकडे आसरा घेतला.

गुरुवारी मध्यरात्री ते अगदी पहाटे चार वाजेपर्यंत उमरेड तालुक्यातील बेला या गावानजीकच्या सावंगी (बुजरुक) येथे हा प्रसंग घडला. जुनापाणी (नागपूर ग्रामीण) येथील तलाव फुटला. वडगाव धरणाच्या पाण्याची पातळी वाढली. प्रशासकीय यंत्रणासुद्धा जागी होती. परिस्थिती समजून घेत प्रशासनाने वडगाव धरणाच्या पाण्याचा विसर्ग काढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे सावंगी बुजरुक येथील नाल्यालगतची पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. या सावंगी नाल्यालगत चंद्रभान वाघमारे, मुरलीधर हिवंज, सुंदराबाई हिवंज, शंकर वाघमारे, नारायण जयस्वाल या पाच कुटुंबीयांची घरे आहेत. पाणी वाढत असल्याचा धोका या कुटुंबीयांनासुद्धा लक्षात आला. पाचही कुटुंबीयांनी एकमेकांना धीर देत रात्र जागून काढण्याचे ठरविले. सायंकाळपासून पाणी सभोवताली वाढत होते. तासातासाला धोका अधिकच वाढत होता. अशातच घरातील महत्त्वपूर्ण साहित्य त्यांनी खाटेला दोरखंडाने बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण खाटच घराच्या आडोशाला बांधला.

पाचही कुटुंबांतील २१ जणांनी गावातील नातेवाइकांकडे पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुक्काम केला. या पाचही कुटुंबीयांच्या घरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. त्यांचे संपूर्ण घर चिखलमय झाले होते. अखेरीस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजतापासून नाल्यातील पाणी ओसरू लागले. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाचही कुटुंबीयांनी परतीची वाट धरली. तहसीलदार संदीप कुंडेकर, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी नितेश माने यांनी पाहणी करीत कुटुंबीयांचे कौतुक केले. त्यांना धीर दिला.

जागले म्हणून वाचले

सायंकाळपासूनच सभोवताली पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याचे लक्षात आल्याने पाचही कुटुंबीय सतर्क झालेत. मोठ्या हिमतीने शक्कल लढवित बहुतांश साहित्य खाटेला बांधले आणि स्वत: सुरक्षित ठिकाणी पोहोचले. कदाचित ते जागले नसते आणि पाणी अधिक प्रमाणात वाढले असते तर जीवघेणा सामना करावा लागला असता.

टॅग्स :floodपूर