शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जीव टांगणीला अन् खाट आडोशाला! जागले म्हणून वाचले; नागपूर जिल्ह्यातील पूरकहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 07:30 IST

Nagpur News घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली.

अभय लांजेवार

नागपूर : आपल्या घराच्या अवतीभवती पाणी वाढू शकते. घरातही पाणी शिरणार. धोका संभवू शकतो, असा अंदाज बांधून त्यांनी रात्री २ वाजेपर्यंत जागरण केले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली. एकूण पाच कुटुंबांतील २१ जणांनी सहीसलामत बाहेर पडत आप्तस्वकीयांकडे आसरा घेतला.

गुरुवारी मध्यरात्री ते अगदी पहाटे चार वाजेपर्यंत उमरेड तालुक्यातील बेला या गावानजीकच्या सावंगी (बुजरुक) येथे हा प्रसंग घडला. जुनापाणी (नागपूर ग्रामीण) येथील तलाव फुटला. वडगाव धरणाच्या पाण्याची पातळी वाढली. प्रशासकीय यंत्रणासुद्धा जागी होती. परिस्थिती समजून घेत प्रशासनाने वडगाव धरणाच्या पाण्याचा विसर्ग काढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे सावंगी बुजरुक येथील नाल्यालगतची पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. या सावंगी नाल्यालगत चंद्रभान वाघमारे, मुरलीधर हिवंज, सुंदराबाई हिवंज, शंकर वाघमारे, नारायण जयस्वाल या पाच कुटुंबीयांची घरे आहेत. पाणी वाढत असल्याचा धोका या कुटुंबीयांनासुद्धा लक्षात आला. पाचही कुटुंबीयांनी एकमेकांना धीर देत रात्र जागून काढण्याचे ठरविले. सायंकाळपासून पाणी सभोवताली वाढत होते. तासातासाला धोका अधिकच वाढत होता. अशातच घरातील महत्त्वपूर्ण साहित्य त्यांनी खाटेला दोरखंडाने बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण खाटच घराच्या आडोशाला बांधला.

पाचही कुटुंबांतील २१ जणांनी गावातील नातेवाइकांकडे पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुक्काम केला. या पाचही कुटुंबीयांच्या घरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. त्यांचे संपूर्ण घर चिखलमय झाले होते. अखेरीस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजतापासून नाल्यातील पाणी ओसरू लागले. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाचही कुटुंबीयांनी परतीची वाट धरली. तहसीलदार संदीप कुंडेकर, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी नितेश माने यांनी पाहणी करीत कुटुंबीयांचे कौतुक केले. त्यांना धीर दिला.

जागले म्हणून वाचले

सायंकाळपासूनच सभोवताली पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याचे लक्षात आल्याने पाचही कुटुंबीय सतर्क झालेत. मोठ्या हिमतीने शक्कल लढवित बहुतांश साहित्य खाटेला बांधले आणि स्वत: सुरक्षित ठिकाणी पोहोचले. कदाचित ते जागले नसते आणि पाणी अधिक प्रमाणात वाढले असते तर जीवघेणा सामना करावा लागला असता.

टॅग्स :floodपूर