शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

समर शेड्युलमध्ये वाढू शकतात उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

वसीम कुरैशी नागपूर : अनलॉकनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २४ ते २७ विमानांची उड्डाणे होत आहेत. ...

वसीम कुरैशी

नागपूर : अनलॉकनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २४ ते २७ विमानांची उड्डाणे होत आहेत. लॉकडाऊनपूर्वीसारखी घरगुती उड्डाणांच्या स्थितीकरिता ३० पेक्षा जास्त उड्डाणांचे प्रस्थान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता समर शेड्युलमध्ये ही उड्डाणे वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत नागरी उड्डयण संचालनालयाच्या (डीजीसीए) नवी दिल्ली येथील मुख्यालयात शेड्युलसंदर्भात बैठक होणार आहे. समर शेड्युलबाबत विभिन्न विमान कंपन्या नवीन मार्गावर फेऱ्या वाढविण्यावर प्रस्ताव सादर करतील. यामध्ये नागपूर विमानतळावरून एक विमान कंपनी तीन ते चार उड्डाणे सुरू करण्याची शक्यता आहे.

मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) अधिकारी सूत्रांनी सांगितले की, अनेक दिवसापासून बंद असलेली जेट एअरवेजची उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा आहे. जेटच्या टीमने यासंदर्भात नागपूर विमानतळ व्यवस्थापनाशी संपर्क केला आहे. याशिवाय एअर इंडियाचे सायंकाळचे मुंबई उड्डाण मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. जेट व एअर इंडियाच्या या दोन उड्डाणांव्यतिरिक्त जर समर शेड्युलमध्ये अपेक्षानुसार चार अतिरिक्त उड्डाणांचा समावेश होत असेल तर एकूण सहा नवीन उड्डाणे सहभागी होतील. यासह ३२ ते ३३ विमानांचे प्रस्थान होईल.

परंतु नागपुरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सध्या बंद आहेत. ही उड्डाणे पुढील काही दिवसात सुरू होण्याचे काहीही संकेत नाहीत. कतार व शारजाहला जाणारे निरंतर सोशल मीडियावर उड्डाणाची मागणी करीत आहेत.