शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

ध्वज उंच धरा रे...

By admin | Updated: January 26, 2015 01:00 IST

राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवताना प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथ.आणि माध्य.) त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा,

प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरल्यास कारवाई : ध्वज सन्मान मोहीमनागपूर: राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवताना प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथ.आणि माध्य.) त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, शिक्षण संस्थांना या संदर्भातील सर्व नियम निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार २६ जानेवारी,१५ आॅगस्ट किंवा इतर राष्ट्रीय उत्सवादरम्यान प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांनाही याची अंमलबजावणी करायची आहे.राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी प्लास्टिक झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते कचऱ्यात टाकले जातात. यामुळे ध्वजाचा अपमान तर होतोच शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक राष्ट्रध्वज बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थानीही विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमानंतर प्रांगणात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले कागदी किंवा प्लास्टिकचे ध्वज उचलण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वज वापरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आणि तालुकापातळीवर समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीचे स्वत: जिल्हाधिकारी अध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव आहेत. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार अध्यक्ष,खंडविकास अधिकारी सचिव आणि ठाणेदार, सा.बा. विभागाचे उपअभियंता, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका अधीक्षक (भूमी अभिलेख) समितीचे सदस्य आहेत.शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कागदी तसेच प्लास्टिक राष्ट्रध्वज निर्मितीस व वितरणावर पायबंद घालण्यासाठी वितरण आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनीही ते खरेदी करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान रस्त्यावर पडलेले कागदी किवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे आणि गोळा केलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयाकडे सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)