शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत १,११८ शेतकरी वळले मूळ बियाण्यांच्या लागवडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 09:21 IST

Nagpur News महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाला विदर्भातील धानाच्या पट्ट्यात यश

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत. २०१४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमातून लुप्त होत चाललेले धान, जवस, लाखोळी, कंदमुळे, रानभाज्या आणि रानफळे पुन्हा माळरानावर दिसायला लागली आहेत.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे यांच्या सहकार्याने २०१४ पासून तीन जिल्ह्यांतील साकोली, भंडारा, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, ब्रह्मपुरी आणि नागभीड या ६ तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात आहे. भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या माध्यमातून या तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू आहे.

धानाच्या लाखावर मूळ जाती लुप्त झाल्याने यावर अधिक भर आहे. या उपक्रमातून पारंपरिक धानाचा शोध व संरक्षण आणि बीज शुद्धीकरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर १४३ एकरांत हा उपक्रम सुरू आहे. लुचई पिवळी, चिन्नोर, काली कम्मोर, हिरानथी (तुळशी मंजुळा), दुबराज, काळीकन्नीचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सुरू आहे. एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे हे बियाणे हस्तांतरित होऊन पेरले जात असल्याने दरवर्षी हे क्षेत्र वाढत आहे.

धानच नाही तर रानभाज्या, रानकंदही !

केवळ धानच नाही तर दुर्मीळ झालेला पांढरा जवस आणि करड्या जवसाचा प्रयोगही ७२ एकरांत यशस्वी झाला आहे. यासोबत लाख व लाखोळी ९८ एकरांत घेण्यात येत आहे. १,११८ शेतकरी यास सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ८०४.१० क्विंटल धान्य व ३१६.६९ क्विंटल बियाणे यातून निर्माण झाले आहे. रबीत लाख, लाखोळी व जवसाचे ३२९ एकरांत उत्पन्न घेतल्याची नोंद आहे. इतर पारंपरिक १८ बियाण्यांचा शोध घेऊन बीज शुद्धीकरण प्रक्रिया सुरू आहे. सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात रानभाज्यांचे ३२ प्रकार, रानकंदांचे १२ व रानफळांचे ११ प्रकार संवर्धित झाले आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर जैवविविधता जपणूक आणि व्यवस्थापन प्रक्रियेसाठी तीनही जिल्ह्यांतील ३६ ग्रामपंचायतींमध्ये जैविविधता समित्यांची स्थापना केली. १२ संस्थांना क्षमता विकासाचे प्रशिक्षण दिले. परसबाग लागवडीसाठी महिलांना प्रोत्साहित केले.

- अविल बोरकर, सचिव, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा

...

टॅग्स :agricultureशेती