शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पाच वर्षांत १,११८ शेतकरी वळले मूळ बियाण्यांच्या लागवडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 09:21 IST

Nagpur News महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाला विदर्भातील धानाच्या पट्ट्यात यश

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत. २०१४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमातून लुप्त होत चाललेले धान, जवस, लाखोळी, कंदमुळे, रानभाज्या आणि रानफळे पुन्हा माळरानावर दिसायला लागली आहेत.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे यांच्या सहकार्याने २०१४ पासून तीन जिल्ह्यांतील साकोली, भंडारा, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, ब्रह्मपुरी आणि नागभीड या ६ तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात आहे. भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या माध्यमातून या तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू आहे.

धानाच्या लाखावर मूळ जाती लुप्त झाल्याने यावर अधिक भर आहे. या उपक्रमातून पारंपरिक धानाचा शोध व संरक्षण आणि बीज शुद्धीकरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर १४३ एकरांत हा उपक्रम सुरू आहे. लुचई पिवळी, चिन्नोर, काली कम्मोर, हिरानथी (तुळशी मंजुळा), दुबराज, काळीकन्नीचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सुरू आहे. एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे हे बियाणे हस्तांतरित होऊन पेरले जात असल्याने दरवर्षी हे क्षेत्र वाढत आहे.

धानच नाही तर रानभाज्या, रानकंदही !

केवळ धानच नाही तर दुर्मीळ झालेला पांढरा जवस आणि करड्या जवसाचा प्रयोगही ७२ एकरांत यशस्वी झाला आहे. यासोबत लाख व लाखोळी ९८ एकरांत घेण्यात येत आहे. १,११८ शेतकरी यास सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ८०४.१० क्विंटल धान्य व ३१६.६९ क्विंटल बियाणे यातून निर्माण झाले आहे. रबीत लाख, लाखोळी व जवसाचे ३२९ एकरांत उत्पन्न घेतल्याची नोंद आहे. इतर पारंपरिक १८ बियाण्यांचा शोध घेऊन बीज शुद्धीकरण प्रक्रिया सुरू आहे. सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात रानभाज्यांचे ३२ प्रकार, रानकंदांचे १२ व रानफळांचे ११ प्रकार संवर्धित झाले आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर जैवविविधता जपणूक आणि व्यवस्थापन प्रक्रियेसाठी तीनही जिल्ह्यांतील ३६ ग्रामपंचायतींमध्ये जैविविधता समित्यांची स्थापना केली. १२ संस्थांना क्षमता विकासाचे प्रशिक्षण दिले. परसबाग लागवडीसाठी महिलांना प्रोत्साहित केले.

- अविल बोरकर, सचिव, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा

...

टॅग्स :agricultureशेती