शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाच वर्षांत १,११८ शेतकरी वळले मूळ बियाण्यांच्या लागवडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 09:21 IST

Nagpur News महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाला विदर्भातील धानाच्या पट्ट्यात यश

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत. २०१४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमातून लुप्त होत चाललेले धान, जवस, लाखोळी, कंदमुळे, रानभाज्या आणि रानफळे पुन्हा माळरानावर दिसायला लागली आहेत.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे यांच्या सहकार्याने २०१४ पासून तीन जिल्ह्यांतील साकोली, भंडारा, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, ब्रह्मपुरी आणि नागभीड या ६ तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात आहे. भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या माध्यमातून या तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू आहे.

धानाच्या लाखावर मूळ जाती लुप्त झाल्याने यावर अधिक भर आहे. या उपक्रमातून पारंपरिक धानाचा शोध व संरक्षण आणि बीज शुद्धीकरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर १४३ एकरांत हा उपक्रम सुरू आहे. लुचई पिवळी, चिन्नोर, काली कम्मोर, हिरानथी (तुळशी मंजुळा), दुबराज, काळीकन्नीचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सुरू आहे. एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे हे बियाणे हस्तांतरित होऊन पेरले जात असल्याने दरवर्षी हे क्षेत्र वाढत आहे.

धानच नाही तर रानभाज्या, रानकंदही !

केवळ धानच नाही तर दुर्मीळ झालेला पांढरा जवस आणि करड्या जवसाचा प्रयोगही ७२ एकरांत यशस्वी झाला आहे. यासोबत लाख व लाखोळी ९८ एकरांत घेण्यात येत आहे. १,११८ शेतकरी यास सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ८०४.१० क्विंटल धान्य व ३१६.६९ क्विंटल बियाणे यातून निर्माण झाले आहे. रबीत लाख, लाखोळी व जवसाचे ३२९ एकरांत उत्पन्न घेतल्याची नोंद आहे. इतर पारंपरिक १८ बियाण्यांचा शोध घेऊन बीज शुद्धीकरण प्रक्रिया सुरू आहे. सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात रानभाज्यांचे ३२ प्रकार, रानकंदांचे १२ व रानफळांचे ११ प्रकार संवर्धित झाले आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर जैवविविधता जपणूक आणि व्यवस्थापन प्रक्रियेसाठी तीनही जिल्ह्यांतील ३६ ग्रामपंचायतींमध्ये जैविविधता समित्यांची स्थापना केली. १२ संस्थांना क्षमता विकासाचे प्रशिक्षण दिले. परसबाग लागवडीसाठी महिलांना प्रोत्साहित केले.

- अविल बोरकर, सचिव, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा

...

टॅग्स :agricultureशेती