शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपूर जिल्ह्यातील पाच हजार कोटींचे प्रकल्प मविआ सरकारने रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 20:14 IST

Nagpur News मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने पाच हजार कोटींचे महत्वाकांक्षी प्रकल्प रोखल्याचे पाप केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्देभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आढावानागपूर अधिवेशनात मंजुरीसाठी प्रयत्न करणार

 

नागपूर ः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पाच हजार कोटींचे महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर केले. मात्र, मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने हे सर्व प्रकल्प रोखल्याचे पाप केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विशेष म्हणजे, नागपूरकरांची तहान भागविण्यासाठी सुमारे दोन हजार ७०० कोटींच्या योजनेसह अनेक प्रकल्पांचा समावेश होता.  

रखडलेल्या या प्रकल्पांना जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आज  बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती पुढे आली. नागपूरकरांसाठी जीवाभावाच्या ठरणाऱ्या या प्रकल्पांना महविकास आघाडी सरकारने वाटाण्याच्या अक्षता कशा लावल्या, त्याचा पाढाच आज वाचण्यात आला.

प्रसारमाध्यमाशी बोलताना  बावनकुळे म्हणाले , 'नागपूर शहर आणि जिल्ह्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने पाच हजार कोटींच्या विकासात्मक योजना मंजूर करण्यात केल्या. दीक्षाभूमीसाठी शंभर कोटींची तरतूद, ताजबाग आणि कोराडीच्या महालक्ष्मी देवस्थानासाठी करण्यात आलेल्या योजनांसह विविध विकासकामांमध्ये महाविकास आघाडीने खोडा घातला. महपालिकेचे ९०० कोटी रुपये रोखले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा अडीचशे कोटीचा प्रस्ताव रोखला. टाऊन हाॅलचा प्रस्ताव रोखला. अनेक तलावाचे प्रस्ताव थांबवले. इतकेच नव्हे तर, मध्यप्रदेशातील घोगरी ते तोतलाडोह ही 62 किलोमीटरचा मंजूर बोगदाही सरकारने रखडविला. ही सर्व कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात आली. येत्या नागपूर अधिवेशनात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांना मंजुरी द्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नसल्याने काम थांबण्याचा प्रश्नच नाही. ज्या कामांना मंजुरी मिळाली, ते कामे महाविकास आघाडी सरकारने थांबवली होती,असेही बावनकुळे यांनी सांगितले 

पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपपंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या भाजपशिवाय अन्य विचारही करू शकत नाही. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी जे स्वप्न बघत आहे ते पूर्ण होणार नाही. मिटकरींनी त्यांच्या पक्षात काय घडणार आहे हे प्रथम पाहावे असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे