शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपूर जिल्ह्यातील पाच हजार कोटींचे प्रकल्प मविआ सरकारने रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 20:14 IST

Nagpur News मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने पाच हजार कोटींचे महत्वाकांक्षी प्रकल्प रोखल्याचे पाप केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्देभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आढावानागपूर अधिवेशनात मंजुरीसाठी प्रयत्न करणार

 

नागपूर ः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पाच हजार कोटींचे महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर केले. मात्र, मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने हे सर्व प्रकल्प रोखल्याचे पाप केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विशेष म्हणजे, नागपूरकरांची तहान भागविण्यासाठी सुमारे दोन हजार ७०० कोटींच्या योजनेसह अनेक प्रकल्पांचा समावेश होता.  

रखडलेल्या या प्रकल्पांना जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आज  बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती पुढे आली. नागपूरकरांसाठी जीवाभावाच्या ठरणाऱ्या या प्रकल्पांना महविकास आघाडी सरकारने वाटाण्याच्या अक्षता कशा लावल्या, त्याचा पाढाच आज वाचण्यात आला.

प्रसारमाध्यमाशी बोलताना  बावनकुळे म्हणाले , 'नागपूर शहर आणि जिल्ह्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने पाच हजार कोटींच्या विकासात्मक योजना मंजूर करण्यात केल्या. दीक्षाभूमीसाठी शंभर कोटींची तरतूद, ताजबाग आणि कोराडीच्या महालक्ष्मी देवस्थानासाठी करण्यात आलेल्या योजनांसह विविध विकासकामांमध्ये महाविकास आघाडीने खोडा घातला. महपालिकेचे ९०० कोटी रुपये रोखले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा अडीचशे कोटीचा प्रस्ताव रोखला. टाऊन हाॅलचा प्रस्ताव रोखला. अनेक तलावाचे प्रस्ताव थांबवले. इतकेच नव्हे तर, मध्यप्रदेशातील घोगरी ते तोतलाडोह ही 62 किलोमीटरचा मंजूर बोगदाही सरकारने रखडविला. ही सर्व कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात आली. येत्या नागपूर अधिवेशनात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांना मंजुरी द्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नसल्याने काम थांबण्याचा प्रश्नच नाही. ज्या कामांना मंजुरी मिळाली, ते कामे महाविकास आघाडी सरकारने थांबवली होती,असेही बावनकुळे यांनी सांगितले 

पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपपंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या भाजपशिवाय अन्य विचारही करू शकत नाही. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी जे स्वप्न बघत आहे ते पूर्ण होणार नाही. मिटकरींनी त्यांच्या पक्षात काय घडणार आहे हे प्रथम पाहावे असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे