शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

कोरोनाच्या दृष्टीने पाच तालुके रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST

ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही ...

ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही दिवसांत पुन्हा वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी आहे. परंतु, ग्रामीण भागातील संख्या वाढू नये म्हणून आणि ती नियंत्रणात राहावी, यासाठी ग्रामीण भागात पुन्हा एकदा तपासण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी असली, तरी काही तालुक्यांतील परिस्थिती मात्र चांगली नाही. येथील पॉझिटिव्हिटी जास्त आहे. अशा तालुक्यांवर प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, हिंगणा व उमरेड तालुक्यांचा समावेश आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्केपेक्षा कमी असावा. हिंगणामध्ये डिसेंबर महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट २०.७ इतका होता. जानेवारीत तो ९.११ इतका आणि फेब्रुवारीमध्येही तो तसाच कायम आहे. कामठीत डिसेंबरला ५.९ टक्के होता. तो जानेवारीत १०.०२ वर आला. कळमेश्वरमध्ये १०.११ वरून ६.५३, काटोल ६.६ करून ५.१, कुही ६.१ वरून २.९६ टक्के झाला. मौद्यात ६.७ वरून ६.५७, नागपूर (ग्रा.) ११.२ वरून १९ टक्के, उमरेड ६.४ वर कायम आहे. नरखेड ५.६ वर कायम आहे. रामटेक ४.४ वरून ५.५८, सावनेर ९.५ वरून १०.५ वर आला आहे. म्हणजेच नागपूर, सावनेर, कामठी, हिंगणा येथे पॉझिटिव्हिटी दर वाढत आहे. तर, राज्याच्या तुलनेत ग्रामीण भागाचा कोरोनाचा मृत्युदर हा २.८४ टक्के म्हणजेच अधिक आहे. यात हिंगणा, कळमेश्वर, नागपूर, नरखेड, रामटेक व उमरेडमध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत. ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. परिणामी, जिल्ह्यात या तालुक्यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.

बॉक्स

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा पुन्हा कडक प्रतिबंध

कोरोना वाढू नये म्हणून सुरुवातीला शासनाने अतिशय कडक प्रतिबंध घातले. मध्यंतरी, सर्व व्यवहार सुरळीत झाले. कोरोनाही नियंत्रणात होता. परंतु, मागील काही दिवसांत कोरोनाची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागिरकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्यावी. होम क्वारंटाइन व्हावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना नियंत्रणात राहील, अन्यथा प्रशासनाला पुन्हा कडक प्रतिबंध घालावे लागेल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.