शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कोरोनाच्या दृष्टीने पाच तालुके रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST

ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही ...

ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही दिवसांत पुन्हा वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी आहे. परंतु, ग्रामीण भागातील संख्या वाढू नये म्हणून आणि ती नियंत्रणात राहावी, यासाठी ग्रामीण भागात पुन्हा एकदा तपासण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी असली, तरी काही तालुक्यांतील परिस्थिती मात्र चांगली नाही. येथील पॉझिटिव्हिटी जास्त आहे. अशा तालुक्यांवर प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, हिंगणा व उमरेड तालुक्यांचा समावेश आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्केपेक्षा कमी असावा. हिंगणामध्ये डिसेंबर महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट २०.७ इतका होता. जानेवारीत तो ९.११ इतका आणि फेब्रुवारीमध्येही तो तसाच कायम आहे. कामठीत डिसेंबरला ५.९ टक्के होता. तो जानेवारीत १०.०२ वर आला. कळमेश्वरमध्ये १०.११ वरून ६.५३, काटोल ६.६ करून ५.१, कुही ६.१ वरून २.९६ टक्के झाला. मौद्यात ६.७ वरून ६.५७, नागपूर (ग्रा.) ११.२ वरून १९ टक्के, उमरेड ६.४ वर कायम आहे. नरखेड ५.६ वर कायम आहे. रामटेक ४.४ वरून ५.५८, सावनेर ९.५ वरून १०.५ वर आला आहे. म्हणजेच नागपूर, सावनेर, कामठी, हिंगणा येथे पॉझिटिव्हिटी दर वाढत आहे. तर, राज्याच्या तुलनेत ग्रामीण भागाचा कोरोनाचा मृत्युदर हा २.८४ टक्के म्हणजेच अधिक आहे. यात हिंगणा, कळमेश्वर, नागपूर, नरखेड, रामटेक व उमरेडमध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत. ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. परिणामी, जिल्ह्यात या तालुक्यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.

बॉक्स

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा पुन्हा कडक प्रतिबंध

कोरोना वाढू नये म्हणून सुरुवातीला शासनाने अतिशय कडक प्रतिबंध घातले. मध्यंतरी, सर्व व्यवहार सुरळीत झाले. कोरोनाही नियंत्रणात होता. परंतु, मागील काही दिवसांत कोरोनाची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागिरकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्यावी. होम क्वारंटाइन व्हावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना नियंत्रणात राहील, अन्यथा प्रशासनाला पुन्हा कडक प्रतिबंध घालावे लागेल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.