शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना ...

नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन, अशी शेतकरी व ग्राहकांची व्यथा आहे.

लागवडीसाठी गुंतवणूक वाढल्यानंतरही भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दरही वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरचा भाव प्रति किलो ६० रुपये असला तरीही शेतकऱ्यांच्या हातात २० रुपये येतात. याचप्रमाणे सोमवारी शेतकऱ्यांनी वांगे ६ ते ८ रुपये, टोमॅटो ८ रुपये, हिरवी मिरची १५ रुपये किलो विकली. त्यातुलनेत किरकोळमध्ये ग्राहकांना वांगे २० रुपये, टोमॅटो ३० रुपये आणि हिरवी मिरची ४० रुपये भावात खरेदी करावी लागली. शेतकऱ्यांच्या भावात आणि किरकोळमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या भावात मोठी तफावत दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते.

कोणत्या भाजीला काय भाव (प्रति किलो रुपये)

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी८ २०

टोमॅटो८ ३०

भेंडी १५ ४०

चवळी १५ ४०

पालक५ २०

कोथिंबीर ३० ६०

मेथी २५ ६०

हिरवी मिरची १५ ४०

पत्ताकोबी १५ ४०

फुलकोबी २५ ५०

दोडके १० ३०

कारले २० ५०

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना :

गेल्या काही वर्षांपासून भाज्यांच्या लागवडीची गुंतवणूक वाढली आहे. तसेच वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यानंतरही भाव पूर्वीचेच मिळत आहेत. भाव पडल्यानंतर अनेकदा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे भाज्या तोडून शेतातच फेकून देतो.

केशव आंबटकर, शेतकरी.

राज्य सरकारने भाज्यांचे भाव ठरवून द्यावे. त्यानुसार व्यापारी खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. या मागणीवर सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. पीक जास्त आल्यानंतर टोमॅटो, वांगे, पालक ठोक बाजारात नेण्यासाठी परवडत नाहीत.

उल्हास ठाकरे, शेतकरी.

ग्राहकांना परवडेना :

शेतकऱ्यांचे भाव, ठोक बाजारातील भाव आणि किरकोळमध्ये ग्राहकांना खरेदी कराव्या लागणाऱ्या भाज्यांच्या भावात मोठी तफावत असते. ग्राहकांना तिपटीच्या भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या स्वस्त झाल्याच्या बातम्या नेहमीच खोट्या ठरतात.

प्रशांत शिवणकर, ग्राहक.

अनेक वर्षांपासून भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात. ९० टक्के ग्राहक किरकोळमधूनच भाज्या खरेदी करतात. त्यांचे महिन्याचे बजेट ठरले असते. कधी कधीच भाज्या कमी भावात मिळण्याचा अनुभव येतो. किरकोळमध्ये दुप्पट, तिपटीत भाज्यांची विक्री होते.

संजय शिरोड, ग्राहक.

घाऊक बाजारात प्रत्येक दिवशी आवकीनुसार भाज्यांचे भाव ठरतात. कमी आवक राहिली तर जास्त भाव आणि कमी असली तर शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो. व्यापारी वा अडतिये शेतकऱ्यांकडून रोखीने माल खरेदी करतात. त्यावर थोडा फार नफा कमवून ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतात. किरकोळ विक्रेते कोणत्या भावात विक्री करतात, याच्याशी आमचा संबंध नाही. भावात दरदिवशी फरक असतोच.

नंदकिशोर गौर, अध्यक्ष, कळमना भाजी मार्केट.