शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना ...

नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन, अशी शेतकरी व ग्राहकांची व्यथा आहे.

लागवडीसाठी गुंतवणूक वाढल्यानंतरही भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दरही वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरचा भाव प्रति किलो ६० रुपये असला तरीही शेतकऱ्यांच्या हातात २० रुपये येतात. याचप्रमाणे सोमवारी शेतकऱ्यांनी वांगे ६ ते ८ रुपये, टोमॅटो ८ रुपये, हिरवी मिरची १५ रुपये किलो विकली. त्यातुलनेत किरकोळमध्ये ग्राहकांना वांगे २० रुपये, टोमॅटो ३० रुपये आणि हिरवी मिरची ४० रुपये भावात खरेदी करावी लागली. शेतकऱ्यांच्या भावात आणि किरकोळमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या भावात मोठी तफावत दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते.

कोणत्या भाजीला काय भाव (प्रति किलो रुपये)

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी८ २०

टोमॅटो८ ३०

भेंडी १५ ४०

चवळी १५ ४०

पालक५ २०

कोथिंबीर ३० ६०

मेथी २५ ६०

हिरवी मिरची १५ ४०

पत्ताकोबी १५ ४०

फुलकोबी २५ ५०

दोडके १० ३०

कारले २० ५०

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना :

गेल्या काही वर्षांपासून भाज्यांच्या लागवडीची गुंतवणूक वाढली आहे. तसेच वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यानंतरही भाव पूर्वीचेच मिळत आहेत. भाव पडल्यानंतर अनेकदा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे भाज्या तोडून शेतातच फेकून देतो.

केशव आंबटकर, शेतकरी.

राज्य सरकारने भाज्यांचे भाव ठरवून द्यावे. त्यानुसार व्यापारी खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. या मागणीवर सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. पीक जास्त आल्यानंतर टोमॅटो, वांगे, पालक ठोक बाजारात नेण्यासाठी परवडत नाहीत.

उल्हास ठाकरे, शेतकरी.

ग्राहकांना परवडेना :

शेतकऱ्यांचे भाव, ठोक बाजारातील भाव आणि किरकोळमध्ये ग्राहकांना खरेदी कराव्या लागणाऱ्या भाज्यांच्या भावात मोठी तफावत असते. ग्राहकांना तिपटीच्या भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या स्वस्त झाल्याच्या बातम्या नेहमीच खोट्या ठरतात.

प्रशांत शिवणकर, ग्राहक.

अनेक वर्षांपासून भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात. ९० टक्के ग्राहक किरकोळमधूनच भाज्या खरेदी करतात. त्यांचे महिन्याचे बजेट ठरले असते. कधी कधीच भाज्या कमी भावात मिळण्याचा अनुभव येतो. किरकोळमध्ये दुप्पट, तिपटीत भाज्यांची विक्री होते.

संजय शिरोड, ग्राहक.

घाऊक बाजारात प्रत्येक दिवशी आवकीनुसार भाज्यांचे भाव ठरतात. कमी आवक राहिली तर जास्त भाव आणि कमी असली तर शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो. व्यापारी वा अडतिये शेतकऱ्यांकडून रोखीने माल खरेदी करतात. त्यावर थोडा फार नफा कमवून ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतात. किरकोळ विक्रेते कोणत्या भावात विक्री करतात, याच्याशी आमचा संबंध नाही. भावात दरदिवशी फरक असतोच.

नंदकिशोर गौर, अध्यक्ष, कळमना भाजी मार्केट.