शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना ...

नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन, अशी शेतकरी व ग्राहकांची व्यथा आहे.

लागवडीसाठी गुंतवणूक वाढल्यानंतरही भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दरही वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरचा भाव प्रति किलो ६० रुपये असला तरीही शेतकऱ्यांच्या हातात २० रुपये येतात. याचप्रमाणे सोमवारी शेतकऱ्यांनी वांगे ६ ते ८ रुपये, टोमॅटो ८ रुपये, हिरवी मिरची १५ रुपये किलो विकली. त्यातुलनेत किरकोळमध्ये ग्राहकांना वांगे २० रुपये, टोमॅटो ३० रुपये आणि हिरवी मिरची ४० रुपये भावात खरेदी करावी लागली. शेतकऱ्यांच्या भावात आणि किरकोळमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या भावात मोठी तफावत दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते.

कोणत्या भाजीला काय भाव (प्रति किलो रुपये)

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी८ २०

टोमॅटो८ ३०

भेंडी १५ ४०

चवळी १५ ४०

पालक५ २०

कोथिंबीर ३० ६०

मेथी २५ ६०

हिरवी मिरची १५ ४०

पत्ताकोबी १५ ४०

फुलकोबी २५ ५०

दोडके १० ३०

कारले २० ५०

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना :

गेल्या काही वर्षांपासून भाज्यांच्या लागवडीची गुंतवणूक वाढली आहे. तसेच वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यानंतरही भाव पूर्वीचेच मिळत आहेत. भाव पडल्यानंतर अनेकदा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे भाज्या तोडून शेतातच फेकून देतो.

केशव आंबटकर, शेतकरी.

राज्य सरकारने भाज्यांचे भाव ठरवून द्यावे. त्यानुसार व्यापारी खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. या मागणीवर सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. पीक जास्त आल्यानंतर टोमॅटो, वांगे, पालक ठोक बाजारात नेण्यासाठी परवडत नाहीत.

उल्हास ठाकरे, शेतकरी.

ग्राहकांना परवडेना :

शेतकऱ्यांचे भाव, ठोक बाजारातील भाव आणि किरकोळमध्ये ग्राहकांना खरेदी कराव्या लागणाऱ्या भाज्यांच्या भावात मोठी तफावत असते. ग्राहकांना तिपटीच्या भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या स्वस्त झाल्याच्या बातम्या नेहमीच खोट्या ठरतात.

प्रशांत शिवणकर, ग्राहक.

अनेक वर्षांपासून भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात. ९० टक्के ग्राहक किरकोळमधूनच भाज्या खरेदी करतात. त्यांचे महिन्याचे बजेट ठरले असते. कधी कधीच भाज्या कमी भावात मिळण्याचा अनुभव येतो. किरकोळमध्ये दुप्पट, तिपटीत भाज्यांची विक्री होते.

संजय शिरोड, ग्राहक.

घाऊक बाजारात प्रत्येक दिवशी आवकीनुसार भाज्यांचे भाव ठरतात. कमी आवक राहिली तर जास्त भाव आणि कमी असली तर शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो. व्यापारी वा अडतिये शेतकऱ्यांकडून रोखीने माल खरेदी करतात. त्यावर थोडा फार नफा कमवून ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतात. किरकोळ विक्रेते कोणत्या भावात विक्री करतात, याच्याशी आमचा संबंध नाही. भावात दरदिवशी फरक असतोच.

नंदकिशोर गौर, अध्यक्ष, कळमना भाजी मार्केट.