शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये देशात पाच लाख कोटीचा व्यवसाय ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST

नागपूर : देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश ...

नागपूर : देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुन्हा १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये देशात जवळपास ३.५ लाख कोटींचा किरकोळ व्यवसाय आणि १.५ लाख कोटींचा घाऊक व्यवसाय ठप्प झाला आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे असल्याचे मत देशातील देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणाद्वारे व्यक्त केले आहे. यंदा केंद्र सरकारकडून पॅकेजची अपेक्षा व्यापारी करीत आहेत.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, किराणा, दूध, भाजीपाला, फळांव्यतिरिक्त नागरिक वस्तू केवळ ई-कॉमर्सच्या माध्यमातून मागवीत आहेत. लॉकडाऊन असल्याने घराजवळील दुकानात लोक आवश्यक वस्तूच्या खरेदीसाठी जात आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे बंद आहे. केवळ ग्राहकच नव्हे तर व्यापारीही चिंताग्रस्त आहेत. जर दुकाने उघडल्यास कोणताही व्यापारी, त्यांचे कर्मचारी अथवा ग्राहकांना कोरोना संसर्ग झाल्यास सद्यस्थितीत वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण आहे. यंदा कोरोना महामारीत अनेक व्यापारी संक्रमित झाले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. कॅटने देशात ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले असून, ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

या सर्वेक्षणात व्यापारी व नागरिकांपासून आरोग्य सुविधा आणि लॉकडाऊन वा अन्य पर्यायाचा विचार होत आहे. यासंदर्भात प्रत्येकाचे मत जाणून घेण्यात येत आहे. याशिवाय बाजाराची स्थिती, लॉकडाऊन आणि ग्राहकांच्या खरेदीच्या स्वभावाच्या आधारावर डाटा गोळा करण्यात येत आहे. याशिवाय सर्व प्रमुख व्यापारी संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन महामारीच्या काळात काय करावे, यावर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना काळात वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे. त्यानंतरही व्यवसाय कसा राहील, यावर व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. यावर विचार करून केंद्र सरकारने यंदाही व्यापाऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी.