शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

लॉकडाऊनमध्ये देशात पाच लाख कोटीचा व्यवसाय ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST

नागपूर : देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश ...

नागपूर : देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुन्हा १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये देशात जवळपास ३.५ लाख कोटींचा किरकोळ व्यवसाय आणि १.५ लाख कोटींचा घाऊक व्यवसाय ठप्प झाला आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे असल्याचे मत देशातील देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणाद्वारे व्यक्त केले आहे. यंदा केंद्र सरकारकडून पॅकेजची अपेक्षा व्यापारी करीत आहेत.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, किराणा, दूध, भाजीपाला, फळांव्यतिरिक्त नागरिक वस्तू केवळ ई-कॉमर्सच्या माध्यमातून मागवीत आहेत. लॉकडाऊन असल्याने घराजवळील दुकानात लोक आवश्यक वस्तूच्या खरेदीसाठी जात आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे बंद आहे. केवळ ग्राहकच नव्हे तर व्यापारीही चिंताग्रस्त आहेत. जर दुकाने उघडल्यास कोणताही व्यापारी, त्यांचे कर्मचारी अथवा ग्राहकांना कोरोना संसर्ग झाल्यास सद्यस्थितीत वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण आहे. यंदा कोरोना महामारीत अनेक व्यापारी संक्रमित झाले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. कॅटने देशात ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले असून, ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

या सर्वेक्षणात व्यापारी व नागरिकांपासून आरोग्य सुविधा आणि लॉकडाऊन वा अन्य पर्यायाचा विचार होत आहे. यासंदर्भात प्रत्येकाचे मत जाणून घेण्यात येत आहे. याशिवाय बाजाराची स्थिती, लॉकडाऊन आणि ग्राहकांच्या खरेदीच्या स्वभावाच्या आधारावर डाटा गोळा करण्यात येत आहे. याशिवाय सर्व प्रमुख व्यापारी संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन महामारीच्या काळात काय करावे, यावर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना काळात वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे. त्यानंतरही व्यवसाय कसा राहील, यावर व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. यावर विचार करून केंद्र सरकारने यंदाही व्यापाऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी.