शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये देशात पाच लाख कोटीचा व्यवसाय ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 22:26 IST

Business stalled in lockdown देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुन्हा १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये देशात जवळपास ३.५ लाख कोटींचा किरकोळ व्यवसाय आणि १.५ लाख कोटींचा घाऊक व्यवसाय ठप्प झाला आहे.

ठळक मुद्दे सर्वेक्षणातून माहिती उघड : केंद्र सरकारकडून पॅकेजची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुन्हा १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये देशात जवळपास ३.५ लाख कोटींचा किरकोळ व्यवसाय आणि १.५ लाख कोटींचा घाऊक व्यवसाय ठप्प झाला आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे असल्याचे मत देशातील देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणाद्वारे व्यक्त केले आहे. यंदा केंद्र सरकारकडून पॅकेजची अपेक्षा व्यापारी करीत आहेत.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, किराणा, दूध, भाजीपाला, फळांव्यतिरिक्त नागरिक वस्तू केवळ ई-कॉमर्सच्या माध्यमातून मागवीत आहेत. लॉकडाऊन असल्याने घराजवळील दुकानात लोक आवश्यक वस्तूच्या खरेदीसाठी जात आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे बंद आहे. केवळ ग्राहकच नव्हे तर व्यापारीही चिंताग्रस्त आहेत. जर दुकाने उघडल्यास कोणताही व्यापारी, त्यांचे कर्मचारी अथवा ग्राहकांना कोरोना संसर्ग झाल्यास सद्यस्थितीत वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण आहे. यंदा कोरोना महामारीत अनेक व्यापारी संक्रमित झाले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. कॅटने देशात ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले असून, ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

या सर्वेक्षणात व्यापारी व नागरिकांपासून आरोग्य सुविधा आणि लॉकडाऊन वा अन्य पर्यायाचा विचार होत आहे. यासंदर्भात प्रत्येकाचे मत जाणून घेण्यात येत आहे. याशिवाय बाजाराची स्थिती, लॉकडाऊन आणि ग्राहकांच्या खरेदीच्या स्वभावाच्या आधारावर डाटा गोळा करण्यात येत आहे. याशिवाय सर्व प्रमुख व्यापारी संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन महामारीच्या काळात काय करावे, यावर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना काळात वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे. त्यानंतरही व्यवसाय कसा राहील, यावर व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. यावर विचार करून केंद्र सरकारने यंदाही व्यापाऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार