शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

हिरवळीच्या नावाखाली नागपूर मनपाच्या तिजोरीत पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:29 IST

राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे.

ठळक मुद्देएकही रोपटे लावले नाही निधीही उद्यान विभागाला हस्तांतरित नाही

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील वर्षात महानगरपालिकेने वृक्षकराच्या नावाखाली सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. या करामुळे नागरिकांना अधिकचा संपती कर भरावा लागत आहे. मात्र एवढी मोठी रक्कम कराच्या रूपाने वसूल करूनही महानगरपालिकेने एकही रोपटे शहरात लावले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एप्रिल २०१८ पासून संपती करासोबत वृक्षकराची एक टक्का आकारणी केली जात आहे. २०१८-१९ मध्ये संपती करात वृक्षकरातून ३ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम मिळाली. तर एप्रिल २०१९ ते जुलै २०१९ या काळात एक कोटी १५ लाख १७ हजार रुपये वसूल करण्यात आले; नंतर सप्टेंबरपर्यंतचे आकडे उपलब्ध नाहीत. मात्र पाच कोटींवर वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार मनपा कार्यालय परिसर, रोड साईड, मनपाचे मैदान, उद्यान, सार्वजनिक स्थळे आदी ठिकाणी ही रोपटी लावायची होती. यात कड़ूनिंब, काजू, जांभूळ, पिंपळ, सिसम, लेजेस्टोनिया आदींचा समावेश आहे. मात्र कुठेच या रोपट्यांचे रोपण झालेले नाही.

संपत्ती करामध्ये वृक्षकराची वसुली झाल्यावर ही रक्कम उद्यान विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे या रकमेतून वृक्षारोपण झालेले नाही. सध्या राज्य सरकारकडून मिळालेले ८२ हजार रोपटी लावण्याचे काम सुरू आहे.- अमोल चौरपगारे, उद्यान अधीक्षक, मनपा

रोपटे पूर्णत: विकसित झाल्यावर त्याला वृक्ष म्हणता येईल. खरे तर ही रक्कम मार्च महिन्यातच उद्यान विभागाकडे जायला हवी होती. शहरतील वनराई वाढावी यासाठी सुरू असलेले वृक्षारोपणही नीटपणे व्हायला हवे.- दुनेश्वर पेठे, नगरसेवक

विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे. मात्र त्या बदल्यात किती वृक्ष लावले जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. शहरातील हिरवळ कमी व्हायला नको.- कौस्तुभ चटर्जी 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका