शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

हिरवळीच्या नावाखाली नागपूर मनपाच्या तिजोरीत पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:29 IST

राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे.

ठळक मुद्देएकही रोपटे लावले नाही निधीही उद्यान विभागाला हस्तांतरित नाही

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील वर्षात महानगरपालिकेने वृक्षकराच्या नावाखाली सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. या करामुळे नागरिकांना अधिकचा संपती कर भरावा लागत आहे. मात्र एवढी मोठी रक्कम कराच्या रूपाने वसूल करूनही महानगरपालिकेने एकही रोपटे शहरात लावले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एप्रिल २०१८ पासून संपती करासोबत वृक्षकराची एक टक्का आकारणी केली जात आहे. २०१८-१९ मध्ये संपती करात वृक्षकरातून ३ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम मिळाली. तर एप्रिल २०१९ ते जुलै २०१९ या काळात एक कोटी १५ लाख १७ हजार रुपये वसूल करण्यात आले; नंतर सप्टेंबरपर्यंतचे आकडे उपलब्ध नाहीत. मात्र पाच कोटींवर वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार मनपा कार्यालय परिसर, रोड साईड, मनपाचे मैदान, उद्यान, सार्वजनिक स्थळे आदी ठिकाणी ही रोपटी लावायची होती. यात कड़ूनिंब, काजू, जांभूळ, पिंपळ, सिसम, लेजेस्टोनिया आदींचा समावेश आहे. मात्र कुठेच या रोपट्यांचे रोपण झालेले नाही.

संपत्ती करामध्ये वृक्षकराची वसुली झाल्यावर ही रक्कम उद्यान विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे या रकमेतून वृक्षारोपण झालेले नाही. सध्या राज्य सरकारकडून मिळालेले ८२ हजार रोपटी लावण्याचे काम सुरू आहे.- अमोल चौरपगारे, उद्यान अधीक्षक, मनपा

रोपटे पूर्णत: विकसित झाल्यावर त्याला वृक्ष म्हणता येईल. खरे तर ही रक्कम मार्च महिन्यातच उद्यान विभागाकडे जायला हवी होती. शहरतील वनराई वाढावी यासाठी सुरू असलेले वृक्षारोपणही नीटपणे व्हायला हवे.- दुनेश्वर पेठे, नगरसेवक

विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे. मात्र त्या बदल्यात किती वृक्ष लावले जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. शहरातील हिरवळ कमी व्हायला नको.- कौस्तुभ चटर्जी 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका