शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आधी दिलासा, आता वसुली : वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:08 IST

कोविड-१९ संक्रमणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळेल असे दिसून येत नाही. महावितरणने लॉकडाऊन काळात दिलेली सवलत बंद करून आता वसुली सुरू केली आहे. यामुळे वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्याचा फिक्स्ड चार्ज एकाच वेळी!

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ संक्रमणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळेल असे दिसून येत नाही. महावितरणने लॉकडाऊन काळात दिलेली सवलत बंद करून आता वसुली सुरू केली आहे. यामुळे वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना दोन महिन्याचा फिक्स्ड चार्ज एकाच वेळी भरणे बंधनकारक करण्यात आले असून हे सत्र पुढचे दोन महिने चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोनामुळे २३ मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली आणि १ जूनपासून अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. या काळात व्यावसायिक व औद्योगिक हालचाल ठप्प पडली होती. ही परिस्थिती पाहता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १२ एप्रिल रोजी वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांचे फिक्स्ड चार्ज तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली. मार्चपासून मे व जूनपर्यंत ग्राहकांना सवलत देण्यात आली. मात्र महावितरणने आता ही सवलत समाप्त केली आहे. आता ग्राहकांना जे बिल येत आहेत त्यामध्ये दोन महिन्याचा फिक्स्ड चार्ज वसूल केला जात आहे. यामध्ये चालू महिन्याचा आणि सवलत दिलेल्या महिन्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांचा मनस्ताप वाढला आहे. वीज बिल स्थगित करणे म्हणजे भविष्यात त्याची वसुली होईल, हा त्याचा अर्थ होतो का, असा सवाल ग्राहकांकडून विचारला जात आहे. व्यावसायिकांच्या मते, वाणिज्यिक व औद्योगिक व्यवहार आताही संथ आहेत. त्यामुळे आणखी काही महिने तरी दुप्पट वसुली करण्यात यायला नको होती. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, मागील महिन्याचा फिक्स्ड चार्ज व्याज न घेता वसूल केला जात आहे. कंपनीने केवळ तीन महिन्यांसाठी स्थगित केले होते, असे सांगण्यात येत आहे.वित्त मंत्रालयाच्या फेऱ्यात अडकली सवलतराज्य शासनाने तीन ते चार महिन्याचे वीज बिल एकाच वेळी भरण्याच्या त्रासापासून दिलासा देण्याचा विश्वास दिला होता. त्यासाठी ऊर्जा विभागाने २००० कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. मंत्रिमंडळात यावर दोनदा चर्चाही झाली. ही चर्चा ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झाली. मात्र अर्थ मंत्रालयाने ऊर्जा विभागाचा प्रस्ताव खारीज केला.

 

टॅग्स :electricityवीज