शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आधी मोबदला द्यावा, नंतर काम सुरू करावे

By admin | Updated: March 24, 2017 02:42 IST

रामटेक लोकसभा मतदारसंघात वेकोलिच्या कोळसा खाणीची संख्या अधिक आहे. वेकोलि प्रशासन जागा अधिग्रहित ....

कृपाल तुमाने : वेकिलोसंदर्भात लोकसभेत प्रश्ननागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात वेकोलिच्या कोळसा खाणीची संख्या अधिक आहे. वेकोलि प्रशासन जागा अधिग्रहित करतेवेळी शेतकऱ्यांशी करार करून नुकसानभरपाई व नोकरी देण्याचे आश्वासन दिले जाते. वास्तवात, आधी खाणीचे काम सुरू केले जाते आणि संबंधितांना नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना करार करतेवेळी नुकसान भरपाई द्यावी सोबतच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत केली.या संदर्भात खा. तुमाने यांनी सांगितले की, कोळसाा खाणीसाठी वेकोलि प्रशासन करार करून शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहित करते. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासोबतच प्रकल्पग्रस्तांना किंवा त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना करारानुसार नुकसानभरपाई मिळायला पाहिजे. वास्तवात, खाणीचे काम सुरू केल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. प्रकल्पग्रस्तांना नोकरी देतेवेळी केवळ कामगारपदी नियुक्त केले जाते. खरं तर त्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन वेकोलिने नोकरी द्यायला हवी. काही प्रकल्पग्रस्त किंवा त्यांच्या पाल्यांना पाच ते सहा वर्षांनंतर नोकरी दिली जाते. या काळात अनेकांचे नोकरीचे वय निघून जात असल्याने त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागते, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. रामटेक मतदारसंघातील सिंगोरी येथे कोळसा खाण सुरू करण्यात आली. या प्रकल्पग्रस्तांना ना तर नुकसान भरपाई देण्यात आली, ना ही त्यांना नोकरी देण्यात आली. कंत्राटदाराने काम सुरू केल्याने कंत्राटदार व शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. (जिल्हा प्रतिनिधी)