शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार

By admin | Updated: June 5, 2016 02:46 IST

निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार रिपाइंचे शिष्टमंडळ : प्रदेशाध्यक्ष थूलकर यांची माहितीनागपूर : निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे. त्यानंतर राज्यातील इतर पदांचा विचार केला जाईल. यासंदर्भात विदर्भातील पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपने मित्रपक्ष असलेल्या खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी विधान परिषदेची एक जागा देऊ केली होती. परंतु त्यासंदर्भात रिपाइंचे ज्येष्ठ नेते महातेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही जागा घेण्यास नकार दिला. यावरून पक्षात गैरसमज निर्माण झाला. ही जागा भूपेश थूलकर यांना मिळणार असल्याने त्यांचा पत्ता साफ करण्यासाठीच ही जागा नाकारण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांना विशेषत: विदर्भातील कार्यकर्त्यांना वाटू लागले. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. यातच थुलकर यांनी शनिवारी नागपुरात विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर तर नाही ना, असा संशय व्यक्त केला गेला. परंतु हा केवळ संशयच राहिला.रविभवन येथे रिपाइं (आ) च्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना भूपेश थुलकर यांनी पक्षात कुठलीही फाटाफूट नसल्याचे स्पष्ट केले. खा. रामदास आठवले यांचा निर्णय आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. खा. आठवले यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत राज्यात आम्ही कुठलेही पद घेणार नाही, ही पक्षाची भूमिका आहे. ती सर्वांनाच मान्य आहे. महातेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. तेव्हा खा. आठवले हे देशाबाहेर होते तर मी (प्रदेशाध्यक्ष) पुण्यात होतो. आम्ही दोघेही नसल्याने पक्षाची ती अधिकृत भूमिका आहे की नाही, असे कार्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. परंतु खा. आठवले यांच्याशी बोलूनच महातेकर यांनी जाहीर केल्याचे नंतर स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत विदर्भ अध्यक्ष भीमराव बन्सोड, विदर्भ संघटक राजन वाघमारे, अशोक मेश्राम, आर.एस. वानखेडे, दुर्वास चौधरी, डॉ. भीमराव मस्के, मनोज मेश्राम, भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)१ जुलैपासून विदर्भ जनजागृती अभियान रिपाइंचे संस्थापक सदस्य बाबू हरिदास आवळे यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त येत्या १ जुलैपासून विदर्भ जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भ यात्रा काढणे, जनजागृती करणे आदींंच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भासाठी पक्षातर्फे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असेही शनिवारच्या बैठकीत ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी सांगितले. प्रभाग पद्धतीच्या विरोधात न्यायालयात जाणार चार सदस्यांचा एक प्रभाग ही पद्धती छोट्या पक्षांसाठी तसेच विकासासाठी घातक आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात पक्षातर्फे याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईचे प्रसिद्ध वकील बी.के. बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्याशी समन्वय साधून याचा विरोध केला जाईल, असेही बैठकीत ठरल्याचे थुलकर यांनी सांगितले.