शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नागपुरात झाले आधी भूमिपूजन नंतर घेणार जमिनीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 10:06 IST

कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे.

ठळक मुद्देप्रश्न बुटीबोरीतील २०० बेडच्या रुग्णालयाचा चार महिन्यानंतर एमआयडीसीने ईएसआयसीला सुचविली जागा

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे. याचे भूमिपूजन १५ जुलै रोजी करण्यात आले. परंतु जमीन मात्र निश्चित झालेली नाही. भूमिपूजनाच्या चार महिन्यानंतर एमआयडीसीने पाच एकर जागा चिन्हित केली. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.या रुग्णालयाची आतापर्यंतची कहाणी आश्चर्यजनक आहे. दोन वर्षांपूर्वी बुटीबोरी येथे मध्य भारतातील कामगारांसाठी अत्याधुनिक रुग्णालयाची संकल्पना पुढे आली. एमआयडीसीकडे जागेची मागणी करण्यात आली. सिएट कंपनीजवळ पाच एकर जमीन देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यानंतर तडकाफडकी रुग्णालयाच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली.भूमिपूजनाच्यादिवशी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, ही जागा तर महामार्गापासून १५ किलोमीटर दूर आहे. दूरवरून येणाºया कामगारांना रुग्णालयापर्यंत येण्यास त्रास होईल. यासोबतच ईएसआयसीने एमआयडीसीला जमीन घेण्यास नकार देत नवीन जागा देण्यास सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जागा देण्याचे निर्देश दिले. यानंतर जमिनीचा शोध सुरू झाला. साडेतीन महिन्याच्या परिश्रमानंतर एमआयडीसीच्या अधिकाºयांनी आपल्याच कार्यालयाजवळ पाच एकर जमीन शोधली. ईएसआयसीला सूचित करण्यात आले. ईएसआयसीच्या एका उच्चस्तरीय चमूने नागपुरात येऊन बुटीबोरीतील नवीन जागेची पाहणी केली. सूत्रानुसार स्थानिक कार्यालयाने या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. परंतु अंतिम निर्णय समितीची शिफारस आणि मुख्यालयाच्या भूमिकेवरच अवलंबून आहे.

नवीन जागेबाबत सकारात्मक धोरणईएसआयसीचे असिस्टंट डायरेक्टर मनोज कुमार यादव यांनी सांगितले की, एमआयडीसीने अगोदर ज्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता, तो खूप दूर होता. रुग्णांना यामुळे त्रास झाला असता. त्यामुळे नवीन जागेची मागणी करण्यात आली. आता एमआयडीसीने आपल्या कार्यालयाजवळच पाच एकर जागा चिन्हित केली आहे. या जागेबाबत कार्यालयाचे धोरण सकारात्मक आहे. परंतु अंतिम निर्णय मात्र मुख्यालयातूनच होईल.

१८० कोटीचा प्रकल्पईएसआयसीद्वारे बुटीबोरी येथे प्रस्तावित अत्याधुनिक रुग्णालयाचा प्रकल्प हा १८० कोटीचा आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. मध्य भारतातील कामगारांना आरोग्य सुविधा प्रदान करेल. येथे कॅन्सर रुग्णांसाठी विशेष सुविधा राहतील, असा दावाही केला जात आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल