शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

निर्मल ग्राम योजनेचा फज्जा

By admin | Updated: November 11, 2014 01:09 IST

भिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे

नांद येथे घाणीचे साम्राज्य : सार्वजनिक शौचालयाचा वापर होणार कधी?राम वाघमारे - नांदभिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. राज्य शासनाच्यावतीने निर्मल ग्राम योजनेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. नांद येथे स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने ही योजना राबविण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव करण्याचा संकल्प केल्याने या योजनेंतर्गत नांद येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. या शौचालयात पाण्यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, स्थानिक ग्रामस्थ या सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जाणे पसंत करीत आहेत. परिणामी, लाखो रुपये खर्च करूनही या योजनेला हरताळ फासला जात आहे.सदर शौचालयाचे बांधकाम वर्षभरापूर्वी स्थानिक आठवडी बाजारालगत असलेल्या रिकाम्या जागेवर करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आलेल्या या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याच्या दाराला सदैव कुलूप लावले असल्याचे दिसून येते. या शौचालयाच्या शेजारी नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम नेमके कशासाठी केले, असा प्रश्न उपस्थित होतो. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण आहे. या शौचालयापासून अवघ्या २०० मीटरवर सरपंच भारती भैसारे यांचे घर आहे. शौचालयालगत रस्ता गावात येत असल्याने या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. याच रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या - येणाऱ्या प्रत्येकाला या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून परिसरात पसरलेली घाण साफ करण्याची तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.