शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

भरपाईकरिता रेल्वे रुळावर मृतदेह आढळणे पुरेसे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 08:30 IST

Nagpur News रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळवायची असल्यास केवळ रेल्वे रुळावर मृतदेह आढळून येणे पुरेसे नाही. भरपाई लागू होण्यासाठी दुर्दैवी घटनेचे निकष पूर्ण होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देदुर्दैवी घटना सिद्ध होणे आवश्यक

राकेश घानोडे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका रेल्वे अपघात प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. रेल्वे अपघात पीडितांना रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळवायची असल्यास केवळ रेल्वे रुळावर मृतदेह आढळून येणे पुरेसे नाही. भरपाई लागू होण्यासाठी दुर्दैवी घटनेचे निकष पूर्ण होणे आवश्यक आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात, फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे, हिंसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत. या प्रकरणातील मृत तरुण रेल्वेतून खाली पडल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला होता; परंतु त्याच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट मिळून आले नाही. तो कोणत्या रेल्वेत बसला होता, ही माहिती वारसदार देऊ शकले नाही, तसेच घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नव्हता. याशिवाय, मृताचे घर रेल्वे रुळाजवळ असून, तो नेहमीच रेल्वे रुळ ओलांडत होता. दरम्यान, त्याला रेल्वेची धडक बसल्याचा अहवाल रेल्वे पोलिसांनी दिला. त्यामुळे संबंधित तरुणाचा मृत्यू दुर्दैवी घटनेमुळे झाला, हे सिद्ध होऊ शकले नाही. करिता, न्यायालयाने सदर कायदेशीर बाब स्पष्ट करून वारसदारांना भरपाई देण्यास नकार दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रेल्वेतर्फे ॲड. निरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

वर्धा जिल्ह्यातील घटना

मृताचे नाव शुभम वाघमारे होते. तो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुकास्थित वेळा येथील रहिवासी होता. तो २४ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजता सूत गिरणीमध्ये काम करण्यासाठी घरून निघाला होता. दरम्यान, वाघोली यार्डात रेल्वेची धडक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शुभमच्या आई-वडिलांनी भरपाईसाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणने १३ जुलै २०१८ रोजी तो दावा खारीज केला. परिणामी, आई-वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय