शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

जान बची लाखो पाये...

By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST

पोलीस ठाण्यातील दुहेरी-तिहेरी कोंडीमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका हवालदाराला आपले दोन दात गमवावे लागले. प्रतापनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका विचित्र अपघाती घटनेने शहरातील

दातावर बेतली, हवालदार गंभीर : प्रतापनगर ठाण्यात अपघातनागपूर : पोलीस ठाण्यातील दुहेरी-तिहेरी कोंडीमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका हवालदाराला आपले दोन दात गमवावे लागले. प्रतापनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका विचित्र अपघाती घटनेने शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील ‘नव्या समस्ये’वर लख्ख प्रकाशझोत टाकला आहे. शहरात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यातील अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी तर सोडा अधिकाऱ्यांनाही बसायला पुरेशी जागा नाही. ज्याच्याकडे तक्रार नोंदवायची, गुन्हे दाखल करायचे, तपासाचा प्रगती अहवाल नोंदवायचा, तेवढ्यांनाच फक्त ठाण्यात बसण्याची सोय. त्यामुळे बाकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले काम (लिखापढीचे) करण्यासाठी बसून असलेले उठण्यापर्यंतची वाट बघावी लागते. त्यामुळे अनेक कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाण्याच्या आवारातच घुटमळताना दिसतात. अशीच अवस्था प्रतापनगर पोलीस ठाण्यातील आहे. येथे कर्मचारी अधिकाऱ्यांचे एकूण संख्याबळ १२० आहे. मात्र, संपूर्ण पोलीस ठाण्यात दाटीवाटीने बसवले तरी ५० पेक्षा जास्त कर्मचारी प्रतापनगर ठाण्यात बसू शकत नाहीत. ठाणेदाराला तर स्वतंत्र कक्ष आहे. मात्र, इतरांना कुठे बसवावे, हा प्रश्न रोजच सतावतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात कसेबसे भागून जाते. पावसाळ्यात येथील कर्मचारी अन् कनिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी कोंडी होते. ठाण्यात चक्क पावसाचे पाणी साचते. तशाही स्थितीत आपापले कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी धडपडत असतात. हवालदार नारायण लक्ष्मणराव इटनकर (वय ५४) अशाच प्रकारे आज दुपारी २ च्या सुमारास आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी धडपडत होते. अचानक पाय घसरून धाडकन् आपटले. तोंडाच्या बळावर पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत त्यांना जवळच्याच खासगी इस्पितळात नेले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्यामुळे इटनकर बचावले. मात्र, त्यांचा वरचा आणि खालचा प्रत्येकी एक (एकूण दोन) दात पडला. आजूबाजूचे दात खिळखिळे झाले अन् ओठांनाही जबर दुखापत झाली. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.माहिती साऱ्यांनाच, उपाययोजना नाही!प्रतापनगर ठाण्यातील अपुरी जागा अन् जमा होणारे पावसाचे पाणी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. त्यामुळे कोंडवाड्यासारख्या जागेत वरिष्ठांचे दडपण आणि कामाचा ताण घेऊन काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची तीव्र कोंडी होत आहे. (प्रतिनिधी)