शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुलामगिरी नष्ट करणार

By admin | Updated: September 12, 2016 03:10 IST

देशाच्या बाजारपेठेचे विदेशीकरण झाले आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीतच आहे. पतंजलीच्या माध्यमातून

बाबा रामदेव : पंतप्रधानांची कार्यपद्धती उत्कृष्टनागपूर : देशाच्या बाजारपेठेचे विदेशीकरण झाले आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीतच आहे. पतंजलीच्या माध्यमातून स्वदेशीचा जागर करीत ही आर्थिक गुलामगिरी संपविण्याचा संकल्प योगगुरू बाबा रामदेव यांनी केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे योगगुरू रामदेवबाबा यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबांनी स्वदेशीच्या नावाने उद्योग व राजकीय घडामोडींवर पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. बाबांनी स्वदेशीचा जागर करताना देशातून आर्थिक गुलामगिरी संपविण्याचे पतंजलीचे धोरण असल्याचे सांगितले. देशात १० मोठ्या उद्योगांबरोबर, ५० हून अधिक छोटे उद्योग उभारून, असंख्य ग्राम, लघु व कुटीर उद्योगांना जोडणार असल्याचे सांगितले. देशाची आंतरिक व बाह्य सुरक्षा मजबूत ठेवावी, देशोपयोगी धोरणांची अंमलबजावणी करावी व जगभरात देशाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, ही एका चांगल्या पंतप्रधानांची कार्यप्रणाली असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही क्षेत्रात सर्वश्रेष्ठ काम केले असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. परंतु दुसरीकडे त्यांनी काळ्या पैशाबाबत सरकारचे परिणामकारक प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त केली. काळ्या पैशासंदर्भात सरकारने परिणामकारक व पारदर्शक धोरण राबविण्याबरोबरच, दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे ते म्हणाले. आपण काळ्या पैशाचा मुद्दा उचलल्यास विरोधकांबरोबर सरकारमध्ये अंतर्गत बोंबाबोंब होत असल्याची टीकाही त्यांनी केली. अधिक रकमेच्या नोटांचा वापर होऊ नये या संदर्भात आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजलीकडे २०० हून अधिक संशोधक, क्वॉलिटी प्रॉडक्टची जगातील सर्वात बेस्ट टीम व कोट्यवधी लोकांचा विश्वास असल्यामुळे २०१६-१७ मध्ये १० हजार कोटींचे पतंजलीचे लक्ष्य आहे.(प्रतिनिधी) आता पतंजलीची जिन्सआयुर्वेद, ‘एफएमसीजी’ उत्पादन क्षेत्रात आपल्या अस्तित्वाची यशस्वी छाप सोडल्यानंतर पतंजली आता जिन्सची निर्मिती करणार आहे. आमची स्वदेशीची भूमिका आहे. चॉकलेट, नुडल्स अशा अन्य गृहोपयोगी वस्तूंवर, विदेशी कंपन्यांची छाप होती. या वस्तूंना पतंजलीने स्वदेशी केले आहे. वेशभूषेतही स्वदेशी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पतंजली स्वदेशीची जिन्स निर्माण करून, विदेशी कंपन्यांनाही स्वदेशी जिन्स निर्माण करण्यास भाग पाडणार आहोत. पतंजलीचे स्वदेशी जिन्सच्या संदर्भात संशोधन झाले आहे. लवकरच त्याचे उत्पादन करणार असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.