शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुलामगिरी नष्ट करणार

By admin | Updated: September 12, 2016 03:10 IST

देशाच्या बाजारपेठेचे विदेशीकरण झाले आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीतच आहे. पतंजलीच्या माध्यमातून

बाबा रामदेव : पंतप्रधानांची कार्यपद्धती उत्कृष्टनागपूर : देशाच्या बाजारपेठेचे विदेशीकरण झाले आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीतच आहे. पतंजलीच्या माध्यमातून स्वदेशीचा जागर करीत ही आर्थिक गुलामगिरी संपविण्याचा संकल्प योगगुरू बाबा रामदेव यांनी केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे योगगुरू रामदेवबाबा यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबांनी स्वदेशीच्या नावाने उद्योग व राजकीय घडामोडींवर पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. बाबांनी स्वदेशीचा जागर करताना देशातून आर्थिक गुलामगिरी संपविण्याचे पतंजलीचे धोरण असल्याचे सांगितले. देशात १० मोठ्या उद्योगांबरोबर, ५० हून अधिक छोटे उद्योग उभारून, असंख्य ग्राम, लघु व कुटीर उद्योगांना जोडणार असल्याचे सांगितले. देशाची आंतरिक व बाह्य सुरक्षा मजबूत ठेवावी, देशोपयोगी धोरणांची अंमलबजावणी करावी व जगभरात देशाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, ही एका चांगल्या पंतप्रधानांची कार्यप्रणाली असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही क्षेत्रात सर्वश्रेष्ठ काम केले असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. परंतु दुसरीकडे त्यांनी काळ्या पैशाबाबत सरकारचे परिणामकारक प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त केली. काळ्या पैशासंदर्भात सरकारने परिणामकारक व पारदर्शक धोरण राबविण्याबरोबरच, दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे ते म्हणाले. आपण काळ्या पैशाचा मुद्दा उचलल्यास विरोधकांबरोबर सरकारमध्ये अंतर्गत बोंबाबोंब होत असल्याची टीकाही त्यांनी केली. अधिक रकमेच्या नोटांचा वापर होऊ नये या संदर्भात आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजलीकडे २०० हून अधिक संशोधक, क्वॉलिटी प्रॉडक्टची जगातील सर्वात बेस्ट टीम व कोट्यवधी लोकांचा विश्वास असल्यामुळे २०१६-१७ मध्ये १० हजार कोटींचे पतंजलीचे लक्ष्य आहे.(प्रतिनिधी) आता पतंजलीची जिन्सआयुर्वेद, ‘एफएमसीजी’ उत्पादन क्षेत्रात आपल्या अस्तित्वाची यशस्वी छाप सोडल्यानंतर पतंजली आता जिन्सची निर्मिती करणार आहे. आमची स्वदेशीची भूमिका आहे. चॉकलेट, नुडल्स अशा अन्य गृहोपयोगी वस्तूंवर, विदेशी कंपन्यांची छाप होती. या वस्तूंना पतंजलीने स्वदेशी केले आहे. वेशभूषेतही स्वदेशी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पतंजली स्वदेशीची जिन्स निर्माण करून, विदेशी कंपन्यांनाही स्वदेशी जिन्स निर्माण करण्यास भाग पाडणार आहोत. पतंजलीचे स्वदेशी जिन्सच्या संदर्भात संशोधन झाले आहे. लवकरच त्याचे उत्पादन करणार असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.