शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर ‘ती’ पोहोचली पालकांच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

काटोल: इंस्टाग्रामवर बिहार येथील एका तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली़ त्यानंतर त्या तरुणाला भेटण्यासाठी घर सोडून बिहारला निघालेल्या ...

काटोल: इंस्टाग्रामवर बिहार येथील एका तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली़ त्यानंतर त्या तरुणाला भेटण्यासाठी घर सोडून बिहारला निघालेल्या १३ वर्षीय मुलीच्या शोध घेत काटोल पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथून ताब्यात घेत तिला पालकांच्या स्वाधीन केले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा स्वीकार करून ऑनलाईन अध्यापनाचे काम केले़ या पध्दतीमुळे अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल आले़ दिवसभर मोबाईल त्यांच्या हातात राहत असल्याने त्यांना समाजमाध्यमाची सवय लागली़ या समाजमाध्यमातून अल्पवयीन मुलांच्या फसवणुकीचे गुन्हे घडले़ इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत ओळख झाल्यानंतर त्या मुलाने अल्पवयीन मुलीला बिहार येथे बोलावून घेतले़ मात्र अनुचित प्रकार घडण्याआधीच काटोल पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला. तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय मुलीला शैक्षणिक कामासाठी पालकांनी दोन महिन्याआधी मोबाईल घेऊन दिला होता़ फावल्या वेळेत ही मुलगी समाजमाध्यमाचा वापर करीत होती़ दरम्यान इंस्टाग्रामवर तिची बिहार येथील एका तरुणासोबत ओळख झाली़ मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत या तरुणाने २५ जानेवारीला मुलीला बिहार येथे बोलावले़ याच दिवशी दुपारी ३ वाजता मुलगी बिहारसाठी रवाना झाली़ काटोल बस स्थानकावरून नागपूर. यानंतर नागपूर येथून एर्नाकुलम एक्सप्रेसने ती रवाना झाली़ इकडे रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेऊनही ती दिसून न आल्याने पालकांनी पोलिसात तक्रार दिली़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार महादेव आचरेकर यांनी मुलीजवळ असलेल्या मोबाईलचे लोकेशन घेत तिच्या वडिलांसह एक चमू हुशंगाबाद येथे रवाना केला.

वडील, पोलिसांचा जीव भांड्यात पडला

मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस मुलीचा पाठलाग करीत होते. मध्येच तीचा मोबाईल बंद झाल्याने लाईव्ह लोकेशन पोलिसांना मिळणे बंद झाले़ मात्र काही वेळात तिचा मोबाईल सुरू होताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला़ याच काळात काटोल पोलिसांनी नागपूर येथून बिहारला जाणाऱ्या रेल्वेची माहिती काढली़ या रेल्वेमधील एका डब्यात ती मुलगी असल्याची माहिती मिळाली़ रेल्वेगाडीचे लोकेशन काढले असता तिचा पुढील थांबा हा उत्तरप्रदेशातील गोंडा असल्याचे समजले़ तोच तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलीचा शोध घेण्यास कळविण्यात आले़ रेल्वे पोलिसांनी बोगीची तपासणी केली असता या बोगीमध्ये ही मुलगी प्रवास करीत असल्याचे दिसून आले.

तरुण देत होता सूचना

मुलगी सलग दोन दिवस ९०० कि.मी.चा प्रवास बिहार येथील मुलाच्या सूचनेवरून करीत होती़ या तरुणाने तिला बिहार येथील समस्तीपूर येथे बोलावले होते़ घर सोडल्यापासून ते पोलिसांनी ताब्यात घेईपर्यंत ही मुलगी त्याच्याच सूचनांचे पालन करीत होती़ ज्यावेळी मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते़ ही कारवाई ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार प्रभाकर घोरमाडे, महिला पोलीस हवालदार मोरे, पोलीस नायक धीरज खंते, पोलीस शिपाई आशिष हिरुडकर, सायबर सेल नागपूर ग्रामीणचे पीएसआय जावेद शेख, पोलीस शिपाई सतीश राठोड, पोलीस शिपाई योगेश राजगिरे यांनी पार पाडली़. पोलिसांच्या या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौैतुक केले.