शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये : नागपूर विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 01:12 IST

उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. या मागणीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी विरोध केला आहे.

ठळक मुद्दे उच्चशिक्षण मंत्र्यांची मागणी विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीत टाकणारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. या मागणीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी विरोध केला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द केली तर शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम होईल. कोणताही पुढचा मागचा विचार न करता विद्यापीठांच्या विविध स्तरांतील तळज्ञांसोबत सल्लामसलत न करता अशा प्रकारची केलेली मागणी म्हणजे चर्चेत राहण्याचा प्रकार आहे की काय, असा प्रश्न विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता उच्चशिक्षण मंत्र्यांनी केलेली ही मागणी आणखी संभ्रम निर्माण करणारी आहे. कोणत्याही विद्यापीठाने, कोणत्याही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी, कोणत्याही विद्यार्थी संघटनेने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. शासनानेच नेमलेल्या तज्ज्ञ समितीने जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्यात असे सुचविले. तरीदेखील अशी मागणी होणे हे एक कोडेच आहे. ग्रेड म्हणजे नेमके काय? त्याचा आधार काय असेल हेदेखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही. देशातील इतर राज्यांत परीक्षा होणार असून महाराष्ट्रात असे झाले नाही तर भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीदेखील विष्णू चांगदे यांनी व्यक्त केली.विद्यापीठांच्या तयारीचे काय?जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्यात असे सुचविण्यात आले असून राज्यातील सर्वच विद्यापीठे त्याची तयारी करत आहेत. त्यांच्या तयारीवर पाणी फेरण्याचा हा प्रकार आहे. परदेशात किंवा अन्य राज्यात प्रवेश घेताना पुढे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादनदेखील विष्णू चांगदे यांनी केले.