शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली स्फोटाची चौकशी अंतिम टप्प्यात : एडीजी (ऑपरेशन) राजेंद्रसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 01:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, ऑपरेशन) राजेंद्रसिंग यांनी दिली.

ठळक मुद्देदोन दिवसात अहवाल येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, ऑपरेशन) राजेंद्रसिंग यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी रस्त्यात स्फोटके पेरून जवानांनी भरलेले खासगी वाहन उडवून दिले. या स्फोटात १५ जवान आणि वाहनचालक असे १६ जण शहीद झाले. या स्फोटाची चौकशी एडीजी राजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ते शनिवारी सायंकाळी नागपुरात आले असता निवडक पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना स्फोट कसा झाला आणि कोणती कारण आहेत, त्याबाबत ओझरती माहिती दिली. छुप्या पद्धतीने घात करणे ही नक्षल्यांची नेहमीचीच पद्धत आहे. मात्र, पोलिसांनी नक्षलभागात काय सतर्कता बाळगावी, त्याचे नियम आहे. छोटीशी चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील शैलेश काळे नामक वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा या स्फोटाला कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे, त्याकडे राजेंद्रसिंग यांचे लक्ष वेधले असता त्याची आम्ही चौकशी करीत असल्याचे ते म्हणाले. काळेचा यापूर्वीही डिफॉल्ट रिपोर्ट पाठविण्यात आला होता, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता संवेदनशील नक्षलभागात त्यांना ठेवण्यात आले. त्यांच्या वादग्रस्त व्यक्तीसोबतच्या मैत्रीचाही मुद्दा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला असता संबंधित सर्वच जणांचे कॉल डिटेल्स काढण्यात येतील, असे ते म्हणाले. या संबंधाने उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी तपास सुरू असल्यामुळे बोलणे योग्य होणार नाही, असे म्हटले. येत्या दोन दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढची दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीBlastस्फोट