शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी

By admin | Updated: February 22, 2015 02:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या न्यायपीठासमक्ष प्रकरण ऐकले जाणार आहे. हे प्रकरण १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आले होते.आयुष निर्मल पुगलिया (वय २४) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करून आव्हान दिले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र डागा यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही घटना ११ आॅक्टोबर २०११ रोजीची आहे. सुरुची मसाला कंपनीचे संचालक राजू ऊर्फ प्रशांत कटारिया यांचा सात वर्षीय मुलगा कुश हा शुभम बैद व रिदम पुरिया या दोन मित्रांसोबत खेळत होता. तेवढ्यात आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या आवारात नेले. तेथे आधी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार केला व नंतर त्याचा कटरने गळा कापला. कुशचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला.आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुशचे अपहरण केल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)