शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी

By admin | Updated: February 22, 2015 02:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या न्यायपीठासमक्ष प्रकरण ऐकले जाणार आहे. हे प्रकरण १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आले होते.आयुष निर्मल पुगलिया (वय २४) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करून आव्हान दिले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र डागा यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही घटना ११ आॅक्टोबर २०११ रोजीची आहे. सुरुची मसाला कंपनीचे संचालक राजू ऊर्फ प्रशांत कटारिया यांचा सात वर्षीय मुलगा कुश हा शुभम बैद व रिदम पुरिया या दोन मित्रांसोबत खेळत होता. तेवढ्यात आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या आवारात नेले. तेथे आधी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार केला व नंतर त्याचा कटरने गळा कापला. कुशचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला.आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुशचे अपहरण केल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)