शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

रिक्त पदे ‘डीओपीटी ऑफिस मेमोरेंडम’नुसार भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : राज्य शासनाने पदाेन्नती काेट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेप्रमाणे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : राज्य शासनाने पदाेन्नती काेट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेप्रमाणे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र राज्य धनगर अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विराेध दर्शविला असून, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत केंद्र शासनाच्या ‘डीओपीटी ऑफिस मेमोरेंडम’चा आधार घ्यावा, अशी मागणीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सतीश मासाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

राज्य शासनाने पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत ७ मे राेजी निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी राज्य शासनाने १८ फेब्रुवारी २०२१ राेजी १०० टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता, तसेच २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठता स्थितीनुसार भरण्याचा निर्णय घेतला. धनगर अधिकारी, कर्मचारी संघटनेसह सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी यात सुधारणा करून मागासवर्गीयांना त्यांच्या पदोन्नतीमधील ३३ टक्के पदे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून भरण्याची मागणी शासनाकडे केली होती.

यानुसार शासनाने २० एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे मागासवर्गीयांची पदोन्नतीमधील ३० टक्के पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. ७ मे २०२१ राेजी शासनाने पुन्हा निर्णय बदलविला. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. ४ ऑगस्ट २०१७ राेजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय व केंद्र सरकारचे ‘डीओपीटी ऑफिस मेमोरेंडम’ विचारात न घेता, ७ मे २०२१ राेजी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांची दिशाभूल व अन्याय करणारा असल्याचा आराेपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिष्टमंडळात प्रा. बाबा टेकाडे, शरद नांदुरकर, प्रा. विजय टेकाडे, प्रफुल्ल वडे, अमोल खोरने, अरविंद डाहाके, विठ्ठल खाटिककर यांचा समावेश हाेता.

....

न्यायालयाचा निर्णय

यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली हाेती. आरक्षण काेट्यातील ३३ टक्के पदाेन्नतीची पदे मागासवर्गीयांना देण्यात यावीत, असा निवाडाही सर्वाेच्च न्यायालयाने दिला हाेता. यासाठी उच्च न्यायालयाच्या ४ ऑगस्ट २०१७ च्या आदेशात आरक्षण कायदा २००१ रद्द केला नसल्याने व सर्वोच्च न्यायालयाचे वरील आदेश विचारात घेऊन पदोन्नतीसाठी ज्येष्ठता ही २५ मे २००४ ऐवजी भारत सरकार ‘डीओपीटी’चे ऑफिस मिले मेमोरेंडम’मध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘एक्झिटिंग सीनियरिटी’ विचारात घेऊन पदोन्नती करावी. एक्झिटिंग सिनियरिटी विचारात घेऊनच खुल्या प्रवर्गातील ६७ टक्के पदोन्नती कोट्यातील पदावर पात्र मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, असे म्हटले आहे.