शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मनपाचा वसुलीवर भर

By admin | Updated: May 5, 2014 01:46 IST

नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक रोज शहरातील विविध ठिकाणी कारवाई करून अतिक्रमण हटवितात. परंतु दुसºया दिवशी प्रत्येक ठिकाणी जैसे थे स्थिती दिसून येते.

 विहंग सालगट

नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक रोज शहरातील विविध ठिकाणी कारवाई करून अतिक्रमण हटवितात. परंतु दुसºया दिवशी प्रत्येक ठिकाणी जैसे थे स्थिती दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले असता, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. मनपा अतिक्रमणाच्या नावाखाली केवळ कागदी कारवाई करून वसुली टार्गेट पूर्ण करीत असल्याचे दिसून आले. सध्या वर्धा मार्गावर अनेकांनी झाडाखाली आपली दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. शिवाय प्रत्येक आठवड्यातून दोनवेळा मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक येथे धडक देते. या उपरोक्त येथील अतिक्रमण मात्र जैसे थे आहे. गत सोमवारी दुपारी २ वाजता मनपाच्या धंतोली झोन येथील एका पथकाने (वाहन क्रमांक ३१/डब्ल्यू ५३०५) अशीच वर्धा मार्गावर धडक दिली.

पथकातील कर्मचारी वाहनातून खाली उतरताच सर्वत्र खळबळ माजली. सुरुवातीला मनपा कर्मचाºयांनी दुकानदारांवर चांगलाच दबाव टाकला; परंतु काहीच वेळात सर्वकाही शांत झाले. मनपाचे पथक कोणतीही कारवाई न करता तेथून निघून गेले. दरम्यान, मनपा कर्मचाºयांनी दुकानदाराशी तडजोड करून एक हजार रुपयांची पावती फाडली. जाता जाता एका कर्मचाºयाने फळाच्या दुकानातील द्राक्षाचा स्वादही घेतला. (प्रतिनिधी)

दंड भरा अतिक्रमण करा

यावेळी दुकानदार म्हणाला, त्याच्या गाडीत सुमारे २५ ते २६ हजार रुपयांचा माल होता. अशास्थितीत मनपाच्या पथकाने कारवाई केली असती तर त्याचे फार मोठे नुकसान झाले असते; सोबतच चालानही भरावे लागले असते. त्यामुळे एक हजार रुपये भरा आणि दुकानदारी करा, हा मध्यस्थ मार्ग असल्याचेही तो म्हणाला. रोज २० हजारांच्या वसुलीचे टार्गेट माहिती सूत्रानुसार,मनपाच्या अतिक्रमण विरोधी विभागात कारवाईसाठी तीन पथक तयार केले आहेत. यापैकी प्रत्येक पथकात १० कर्मचारी, चार ते पाच पोलीस कर्मचारी व दोन अभियंत्यांचा समावेश असतो. शिवाय प्रत्येक पथकासोबत एक ट्रक असतो. त्यात जप्ती केलेला माल भरल्या जातो. मनपाच्या या तिन्ही पथकांना रोज किमान २० हजार रुपयांच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करावे लागते.