शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘श्रीनिवास’ला उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा ‘लळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पेंच व्याघ्र प्रकल्पात मुख्य वनसरंक्षक पदावर कर्तव्यावर असताना एम. श्रीनिवास रेड्डी यांना नागपूरपासून ४५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पेंच व्याघ्र प्रकल्पात मुख्य वनसरंक्षक पदावर कर्तव्यावर असताना एम. श्रीनिवास रेड्डी यांना नागपूरपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याचा लय भारी ‘लळा’ होता. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत टिपेश्वर, मानसिंग देव आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी हे तीन अभयारण्य तसेच बोर आणि पेंच हे दोन व्याघ्र प्रकल्प असा संपूर्ण विस्तार होता. या पाच प्रकल्पाचे ‘बॉस’ श्रीनिवास होते. ‘बॉस’ अभयारण्याच्या दिशेने निघाले की, इकडली चांडाळचौकडी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असायची. उमरेड परिसर ‘सावजी तडका’साठी प्रसिद्ध आहे, शिवाय दारूचा पूरही प्रचंड वाहतो. कधी नवेगाव साधू येथील विश्रामगृहावर तर कधी रिसॉर्टवर वन्यजीवप्रेमी साहेब लोकांची ‘संपूर्ण आणि परिपूर्ण’ व्यवस्था करीत असत. कदाचित या आदरातिथ्याच्याच प्रेमात ‘श्रीनिवास’ अडकले होते की काय, अशी चर्चा आता सर्वदूर सुरू आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांना बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांच्या विविध दौऱ्यांची खमंग चर्चा परिसरातही रंगू लागली आहे. अतिशय तापट, मी म्हणेल तो कायदा आणि उर्मट बोलीभाषेमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थरकापच उडत असे, असेही आता बोलले जात आहे. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात करोडो रुपयांची कामे झाली खरी, परंतु त्यातही सखोल चौकशी झाल्यास बरीच ‘लबाडी’ उघडकीस येऊ शकेल.

.....

जैसे ज्याचे कर्म तैसे...

‘लोकमत’ने दिनांक ७ मे रोजीच्या अंकात ‘एक होता ‘श्रीनिवास’ नावाचा वाघ!’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करताच अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांनी तर ‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो ईश्वर’ अशी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करीत श्रीनिवासच्या बाबतीत तसच घडलं, असा खुलेआम रोखठोक शब्दात राग आळवला.

.....

अप्पर प्रधान झाले

वने आणि वन्यजीव विभागात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक हे पद पूर्वी नव्हते. पेंचमध्ये मुख्य वनसंरक्षक असतानाच अचानकपणे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदाची निर्मिती करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक असलेले एम. श्रीनिवास रेड्डी हे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बनले. राज्यात अशा आलिशान पदाच्या कारभाराचा अधिकारी कुणीही नव्हता आणि नाही. खास मंत्रालयातून आपल्या चेलेचपाट्यांच्या आणि बड्यांना सोबतीला घेत श्रीनिवास यांनीच ही फिल्डिंग लावली, असे दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.