शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

पाचपावलीत निराधार महिलेला मारहाण

By admin | Updated: May 7, 2014 02:45 IST

पारिवारिक संपत्तीच्या वादातून निराधार महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला.

संपत्तीचा वाद : सख्खे झाले वैरीनागपूर : पारिवारिक संपत्तीच्या वादातून निराधार महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. पाचपावलीत रविवारी रात्री ८ वाजता ही संतापजनक घटना घडली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप आहे. अवतारसिंग मारवाह आणि रखपालसिंग मारवाह अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पाचपावलीतील वैशालीनगरात आंबेडकर गार्डनजवळ राहतात. पीडित महिला (वय ४८) आरोपींची सख्खी नातेवाईक आहे. तिच्या पतीच्या पारिवारिक संपत्तीचा हिस्सा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ती आरोपींसोबत लढत आहे. हा वाद अनेकदा पोलीस ठाण्यातही गेला. मात्र, आरोपी पैशाच्या बळावर महिलेचा आवाज दाबत आहे. चार महिन्यांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण गुरुद्वारा पंच कमिटीकडे गेले. त्यावेळी तेथे आरोपी अवतारसिंग आणि रखपालसिंग यांनी पीडित महिलेच्या मुलाला २ ट्रक आणि १५ लाख रुपये देण्याची कबुली दिली. पोलिसांकडेही तसेच सांगितले. दर तीन महिन्यानंतर ३ लाखांची किस्त देण्याचे ठरले. दोन्ही गटाला हा तोडगा मान्य असल्यामुळे पंचकमिटीने हा वाद निकाली काढला. दरम्यान, वारंवार मागणी करूनही पीडित महिलेला अवतारसिंग आणि रखपालसिंगने ट्रक अथवा रक्कम दिली नाही. त्यामुळे पीडित महिलेने पाचपावली ठाण्यात दाद मागितली. पोलिसांकडून आरोपींना ही माहिती कळताच त्यांनी रविवारी पीडित महिलेला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. यापुढे कुणाकडे तक्रार केली तर जीवे ठार मारू,अशी धमकीही दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी विनयभंगासह जुजबी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. पोलीस या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.